AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे दोन्ही नेते मला… अजितदादांनंतर आता छगन भुजबळ, शरद पवारांविषयी नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भाष्य केले आहे. याआधी अजित पवार यांनी शरद पवार आमच्यासाठी दैवत आहेत, असं विधान केलं होतं,

हे दोन्ही नेते मला... अजितदादांनंतर आता छगन भुजबळ, शरद पवारांविषयी नेमकं काय म्हणाले?
chhagan bhujbal and sharad pawar
| Updated on: Apr 10, 2025 | 4:22 PM
Share

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना खासदार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्याविषयी भाष्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) कालही माझे दैवत होते, आजही आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. याच विधानानंतर आता आमदार छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आदरस्थानी आहेत, असं त्यांनी म्हटलंय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे दोन्ही नेते मला आदरस्थानी- छगन भुजबळ

“माझं भाग्य आहे की, 25 ते 27 वर्षे मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता मिळालं. म्हटलं तर मी त्यांचा उजवा हात होतो. मला त्यांच्या जवळ राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला. दोन्ही नेते हे मोठे नेते आहेत. या दोघांपासूनही आम्ही शिकलो. हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे एका सभेत भाषण केले होते. या भाषणात त्यांनी अजित पवार यांच्याविषयी भाष्य केले. मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो. आजही दैवत मानतो. मन तळ्यात-मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असं अजित पवार म्हणाले होते. ते विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते.

नगरपालिका, जिल्हा परिषदेचं आरक्षण अडकून

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीआधारित जनगणनेची मागणी केली आहे. यावर बोलताना आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या, अशी मागणी करत आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच “आताही आमचं नगरपालिका, जिल्हा परिषदेचं आरक्षण अडकून आहे. आम्ही आमची जनगणना करा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला आमचं पूर्ण आरक्षण द्या किंवा आमचे माणसं मोजा,” अशी मागणी भुजबळ यांनी केली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.