AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते”

Ambadas Danve on Ayodhya Pol : अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण; ठाकरे गटाच्या नेत्याचा शाब्दिक हल्ला

अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 17, 2023 | 12:16 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसंच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. हे सगळं काल संध्याकाळी हे सगळं प्रकरण घडलं. ठाण्यातील कळवा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पोळ ही आणखी त्वेषाने लढेल. एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं अंबादास दानवे म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये प्रचंड जागा नगरपालिका वापरून ताब्यात घेतल्या आहेत. नगरपरिषद सीईओ अब्दुल सत्तार यांच्याकडे चाप्रशाचा काम करत आहे. चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठी अनेक खटाटोप अब्दुल सत्तार यांनी केली. आताचे आयुक्त अब्दुल सत्तार यांना भीक घालत आहेत. पण त्यांना कायद्यात राहून काम करावे लागेल. कृषी आयुक्त या प्रकरणाची काय चौकशी करणार? कृषी पथकाची चौकशी ही पोलिसांमार्फत झाली पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. अनेक इच्छुक आहेत भाजप आणि शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तार नको आहे. दिल्लीत दर महिन्याला पातशहाला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री जात असावेत, असं ते म्हणालेत.

राज्यात दंगली घडवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक सलोखा बिघडण्याला सरकारचा पाठिंबा आहे का असा स्थिती असल्यामुळे जयंत पाटील यांनी पत्र लिहिलं आहे, असं म्हणत सध्या राज्यात सुरू असलेल्या धार्मिक दंगलींवर भाष्य केलंय.

निधी हा जनतेचा अधिकार आहे, मुख्यमंत्री आमदारांना घरची प्रॉपर्टी लिहून देत नाहीत तो आमदारांचा अधिकार आहे, निधी दिला तरी अधिवेशन वादळी ठरेल, असंही दानवे म्हणालेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार