AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते”

Ambadas Danve on Ayodhya Pol : अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण; ठाकरे गटाच्या नेत्याचा शाब्दिक हल्ला

अयोध्या पोळ यांना एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं, आमचे 50 जण असते तरी पुरून उरले असते
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 12:16 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. तसंच पौळ यांना मारहाणही करण्यात आली आहे. हे सगळं काल संध्याकाळी हे सगळं प्रकरण घडलं. ठाण्यातील कळवा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पोळ ही आणखी त्वेषाने लढेल. एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं अंबादास दानवे म्हणालेत.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये प्रचंड जागा नगरपालिका वापरून ताब्यात घेतल्या आहेत. नगरपरिषद सीईओ अब्दुल सत्तार यांच्याकडे चाप्रशाचा काम करत आहे. चिमणा राजा जागा ताब्यात घेण्यासाठी अनेक खटाटोप अब्दुल सत्तार यांनी केली. आताचे आयुक्त अब्दुल सत्तार यांना भीक घालत आहेत. पण त्यांना कायद्यात राहून काम करावे लागेल. कृषी आयुक्त या प्रकरणाची काय चौकशी करणार? कृषी पथकाची चौकशी ही पोलिसांमार्फत झाली पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. अनेक इच्छुक आहेत भाजप आणि शिवसेनेला मंत्रिमंडळ विस्तार नको आहे. दिल्लीत दर महिन्याला पातशहाला मुजरा करण्यासाठी मुख्यमंत्री जात असावेत, असं ते म्हणालेत.

राज्यात दंगली घडवण्याचे काम सुरू आहे. धार्मिक सलोखा बिघडण्याला सरकारचा पाठिंबा आहे का असा स्थिती असल्यामुळे जयंत पाटील यांनी पत्र लिहिलं आहे, असं म्हणत सध्या राज्यात सुरू असलेल्या धार्मिक दंगलींवर भाष्य केलंय.

निधी हा जनतेचा अधिकार आहे, मुख्यमंत्री आमदारांना घरची प्रॉपर्टी लिहून देत नाहीत तो आमदारांचा अधिकार आहे, निधी दिला तरी अधिवेशन वादळी ठरेल, असंही दानवे म्हणालेत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.