AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण पहिल्यांदा पाकिस्तानने खेळण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर खेळण्याची तयारी केली. असं असताना टीम इंडिया पुन्हा एकदा लाज काढणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय खेळाडू पुन्हा एकदा पाकिस्तानची लाज काढणार, नाणेफेक होताच...Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 14, 2026 | 4:59 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना होणार की नाही याबाबत आधी साशंकता होती. कारण पाकिस्तानने हा सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर यूटर्न घेतला आणि खेळण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे, भारतीय संघाचा पवित्रा मात्र कायम आहे. पाकिस्तानने खेळावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानात जाणार असं कर्णधार सूर्यकुमार यादव तेव्हाच म्हणाला होता. आता सर्व प्रकरण शांत झालं असून सामना होत आहे. पण नाणेफेकीवेळी हस्तांदोलन होईल की नाही याबाबत साशंकता आहे आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत नो हँडशेक पॉलिसीचा अवलंब केला आहे. आशिया कप स्पर्धेत एकदा नाही तर तीनदा हा‍तमिळवणीस नकार दिला. त्यानंतर इतर खेळात आणि फॉर्मेटमध्ये हा कित्ती गिरवला गेला. आता आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे हस्तांदोलनाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलनाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, हा सामना योग्य भावनेने खेळला पाहिजे. त्यांनी आग्रह केला तर पाकिस्तान पारंपारिक हस्तांदोलनासाठी तयार आहे. पण निर्णय भारतीय खेळाडूंवर अवलंबून असेल. “क्रिकेट हे खेळ भावनेने खेळले पाहिजे. माझे वैयक्तिक मत महत्त्वाचे नसू शकते, परंतु क्रिकेट नेहमीप्रमाणेच खेळले पाहिजे. काय करायचे ते त्यांनी ठरवायचे आहे,” असं सलमान आघा म्हणाला.

आशिया कप स्पर्धेत हस्तांदोलन टाळल्याने पीसीबीने आशिया कप 2025 स्पर्धेवर बहिष्काराची वल्गना केली होती. शेवटी सामनाधिकारी पायक्राफ्टला काढून टाकण्याच्या अटीवर सामने खेळले. भारताने त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या हातून आशिया कप ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची आणखी लाज गेली. अजूनही भारताने मिळवलेली आशिया कप ट्रॉफी दुबईच्या कार्यालयात बंदिस्त आहे. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यातील विजयी संघ सुपर 8 फेरीत आपलं स्थान पक्कं करणार आहे.

जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.