AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?

Ambadas Danve on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : आयजीच्या जीवावर बायजी उदार! असं राज्यातील शिंदे सरकार! संजय राऊत बोलले ते खरंच, सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; कुणी दिला दुजोरा?

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?
| Updated on: Aug 30, 2023 | 11:49 AM
Share

छत्रपती संभाजीनगर | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. ग्रामी भागा एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार!, या म्हणी प्रमाणे राज्यातील सध्याचं सरकार आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करेल की नाही ही शंका आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मोदी सरकारला INDIA आघाडी सध्या पर्याय देत आहे. यामुळे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. NDA पेक्षा इंडिया आघाडी मजबूत आहे. लोकांचा या आघाडीला पाठिंबा आहे, असं अंबादास दावने म्हणालेत.

राज्याची नमो योजना कुठं गेली? शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेलेली आहेत. पाऊस होत नाहीये. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अशात सरकाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार युती सरकारमध्ये आल्याने भाजप आणि शिंदेगटाच्या वाट्याची पदं अजित पवार यांच्याकडे गेली आहेत. यामुळे शिंदे गटातील नेते आणि भाजपचेही आमदार नाराज आहेत. भाजपची नाराजीच भाजपला भारी पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावेळी दंगली, हिंसाचार होईल, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलले ते खरंच होतं. दंगली घडल्या हा सरकारचा प्रताप होता. राज्यात सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती जणांवर कारवाई केली गेली, हे सरकारने सांगावं. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात, असं अंबादास दानवे म्हणालेत.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.