AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?

Ambadas Danve on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : आयजीच्या जीवावर बायजी उदार! असं राज्यातील शिंदे सरकार! संजय राऊत बोलले ते खरंच, सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; कुणी दिला दुजोरा?

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?
| Updated on: Aug 30, 2023 | 11:49 AM
Share

छत्रपती संभाजीनगर | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. ग्रामी भागा एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार!, या म्हणी प्रमाणे राज्यातील सध्याचं सरकार आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करेल की नाही ही शंका आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मोदी सरकारला INDIA आघाडी सध्या पर्याय देत आहे. यामुळे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. NDA पेक्षा इंडिया आघाडी मजबूत आहे. लोकांचा या आघाडीला पाठिंबा आहे, असं अंबादास दावने म्हणालेत.

राज्याची नमो योजना कुठं गेली? शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेलेली आहेत. पाऊस होत नाहीये. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अशात सरकाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार युती सरकारमध्ये आल्याने भाजप आणि शिंदेगटाच्या वाट्याची पदं अजित पवार यांच्याकडे गेली आहेत. यामुळे शिंदे गटातील नेते आणि भाजपचेही आमदार नाराज आहेत. भाजपची नाराजीच भाजपला भारी पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावेळी दंगली, हिंसाचार होईल, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलले ते खरंच होतं. दंगली घडल्या हा सरकारचा प्रताप होता. राज्यात सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती जणांवर कारवाई केली गेली, हे सरकारने सांगावं. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात, असं अंबादास दानवे म्हणालेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.