AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?

Ambadas Danve on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : आयजीच्या जीवावर बायजी उदार! असं राज्यातील शिंदे सरकार! संजय राऊत बोलले ते खरंच, सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; कुणी दिला दुजोरा?

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?
| Updated on: Aug 30, 2023 | 11:49 AM
Share

छत्रपती संभाजीनगर | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. ग्रामी भागा एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार!, या म्हणी प्रमाणे राज्यातील सध्याचं सरकार आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करेल की नाही ही शंका आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मोदी सरकारला INDIA आघाडी सध्या पर्याय देत आहे. यामुळे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. NDA पेक्षा इंडिया आघाडी मजबूत आहे. लोकांचा या आघाडीला पाठिंबा आहे, असं अंबादास दावने म्हणालेत.

राज्याची नमो योजना कुठं गेली? शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेलेली आहेत. पाऊस होत नाहीये. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अशात सरकाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार युती सरकारमध्ये आल्याने भाजप आणि शिंदेगटाच्या वाट्याची पदं अजित पवार यांच्याकडे गेली आहेत. यामुळे शिंदे गटातील नेते आणि भाजपचेही आमदार नाराज आहेत. भाजपची नाराजीच भाजपला भारी पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावेळी दंगली, हिंसाचार होईल, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलले ते खरंच होतं. दंगली घडल्या हा सरकारचा प्रताप होता. राज्यात सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती जणांवर कारवाई केली गेली, हे सरकारने सांगावं. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात, असं अंबादास दानवे म्हणालेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.