AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?

Ambadas Danve on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : आयजीच्या जीवावर बायजी उदार! असं राज्यातील शिंदे सरकार! संजय राऊत बोलले ते खरंच, सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; कुणी दिला दुजोरा?

आयजीच्या जीवावर बायजी उदार, असं सध्याचं राज्यातील सरकार!; कुणाचा घणाघात?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 30, 2023 | 11:49 AM
Share

छत्रपती संभाजीनगर | 30 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. ग्रामी भागा एक म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार!, या म्हणी प्रमाणे राज्यातील सध्याचं सरकार आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करेल की नाही ही शंका आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देणार नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली आहे. मोदी सरकारला INDIA आघाडी सध्या पर्याय देत आहे. यामुळे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. NDA पेक्षा इंडिया आघाडी मजबूत आहे. लोकांचा या आघाडीला पाठिंबा आहे, असं अंबादास दावने म्हणालेत.

राज्याची नमो योजना कुठं गेली? शेतकऱ्यांच्या हातची पिकं गेलेली आहेत. पाऊस होत नाहीये. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अशात सरकाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्वाचं आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये, असंही अंबादास दानवे म्हणालेत.

राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. अजित पवार युती सरकारमध्ये आल्याने भाजप आणि शिंदेगटाच्या वाट्याची पदं अजित पवार यांच्याकडे गेली आहेत. यामुळे शिंदे गटातील नेते आणि भाजपचेही आमदार नाराज आहेत. भाजपची नाराजीच भाजपला भारी पडेल, असं अंबादास दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावेळी दंगली, हिंसाचार होईल, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. यावर प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत जे बोलले ते खरंच होतं. दंगली घडल्या हा सरकारचा प्रताप होता. राज्यात सरकार पुरस्कृत दंगली होत आहेत. आतापर्यंत ज्या दंगली झाल्या यात किती जणांवर कारवाई केली गेली, हे सरकारने सांगावं. सरकारचे आमदार तलवार काढतात, धमक्या देतात, असं अंबादास दानवे म्हणालेत.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने