काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट

चिपी विमानतळ उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्ष नेत्यांचं नाव लिहिण्यात आलं नव्हतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील भाजप नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:40 PM

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं उद्घाटन आज करण्यात आलं. विमानतळाच्या उद्घाटनाच्या चर्चेपासून राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरही मोठं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. या उद्घाटन सोहळ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच नारायण राणे यांनी या विमानतळासाठी पुढाकार घेतल्याचं म्हटलंय. फडणवीस यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मात्र टाळलं आहे. (Devendra Fadnavis thanked PM Narendra Modi, avoided mentioning Uddhav Thackeray)

दरम्यान, चिपी विमानतळ उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्ष नेत्यांचं नाव लिहिण्यात आलं नव्हतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील भाजप नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

‘कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे! सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झाले’.

‘कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध’

‘भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचे मनापासून आभार. सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन!’, असं ट्वीट फडणवीस यांनी केलंय.

नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत केली. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री भेटले.. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो… पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे आपल्या भाषणात म्हणाले.

इतर बातम्या : 

महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना उतरणार की नाही? राऊतांनी धडक पत्रकार परिषदच घेतली

‘महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि पारंपारिक नातं’, चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी ज्योतिरादित्य शिंदेचं भावनिक भाषण

Devendra Fadnavis thanked PM Narendra Modi, avoided mentioning Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.