AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत, त्यांनी आम्हाला नेतृत्त्व करण्याची ताकद दिली, असं सांगितलं. शिवाय या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात युतीने जे यश मिळवलंय, ते पाहण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे असायला हवे होते, असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला […]

गोपीनाथ मुंडेंचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jun 03, 2019 | 4:14 PM
Share

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत, त्यांनी आम्हाला नेतृत्त्व करण्याची ताकद दिली, असं सांगितलं. शिवाय या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात युतीने जे यश मिळवलंय, ते पाहण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे असायला हवे होते, असंही ते म्हणाले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुजय विखे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार संजय जाधव यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या उपस्थित होत्या.

“आजचा दिवस काहूर माजवणारा असतो”

आजचा दिवस आमच्यासाठी आठवणींचे काहूर माजवणारा असतो. ज्यांना पाहून आपण मोठं झालो, त्यांना श्रद्धांजली देत असताना अनेक भावना काहूर माजवत असतात. मुंडे साहेबांचं नेतृत्व अफाट होतं, त्यांचा परिसस्पर्श झाला की सामान्य माणूस सुद्धा नेतृत्व करू लागत होता. मुंडे साहेबांनी नेतृत्व शिकवण्याचं काम केलं. मुंडे साहेबांनी आणि प्रमोद महाजनांनी संघर्ष केला, त्याच्या जोरावर भाजप उभी राहिली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंडे साहेब आपल्यात नाहीत याचं दुःख सातत्याने आपल्याला असणार आहे. युतीचे 41 खासदार निवडून आले याचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं आहे. कारण मोदींनी गरीबांच्या कल्याणासाठी कामं केली आहेत. त्यामुळे ना भूतो ना भविष्यती यश दिलं आणि हे यश गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा आहे. कारण त्यांनी आम्हाला नेतृत्व करायला शिकवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ मुडेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“पुढील वेळी मराठवाड्यातल्या सर्व जागा जिंकू”

एक खासदार चार हजार मतांनी राहिला ही कमतरता पुढील वेळी भरून काढू, असं म्हणत औरंगाबादमधील पराभवावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. चार हजार मतांनी आमची संभाजीनगरची सीट आली असती तर गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार झालं असतं. पण यावेळी नाही झालं तरी पुढच्या वेळी मराठवाड्यातल्या आठही जागा युतीच्या असतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गोदावरीच्या खोऱ्यातील भाग दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, या खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी आणले गेले पाहिजे, याचा प्लॅन आम्ही तयार केलाय, तो प्लॅन आम्ही पूर्ण करु. 25 हजार कोटी रुपयांची वाटर ग्रीड योजना पूर्ण करणार आहोत, सगळी धरणे पाईपलाईनने जोडणार आहोत. मुंडे साहेबांचे प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करणार आहोत. मुंडे साहेबांचे स्वप्न जेव्हा साकार करू तेव्हाच आम्हाला त्यांचे नाव घेण्याचा अधिकार मिळेल. पंकजा आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडे यांचा अंश आहेत. त्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

काही लोक म्हणतात, पंकजा गोपीनाथरावांचे नाव का लावतात. अरे त्या नाव लावणार नाहीत तर तुमच्या सारखे करंटे लावतील का… गोपीनाथ मुंडे यांचं नाव त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येकाला लावण्याचा अधिकर आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत लागेल ती मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दुष्काळासाठी खजिना खाली झाला तरी चालेल, पण दुष्काळात कुठेही कमी पडणार नाही. येत्या काळात पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जायचं आहे. आमचं कार्य प्रामाणिक आहे. क्षण ना क्षण लोकांसाठी वाहिलाय. मुंडे साहेबांसारखी आम्ही जनतेची सेवा करु. मुंडे साहेब तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.