AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावरकरांबद्दल ‘असं’ बोलणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधी यांना इशारा

हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

सावरकरांबद्दल 'असं' बोलणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधी यांना इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 17, 2022 | 11:10 AM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सणकून टीका केली आहे. वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्याबद्दल टिप्पणी करणाऱ्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) त्यांनी कडक शब्दात इशारा दिलाय. महाराष्ट्रातील जनता हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान सहन करू शकत नाहीत. सावरकर स्मारकात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय..

राहुल गांधी यांना इशारा देतानाच एकनाथ शिंदे यांनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला.

मुख्यमंत्री म्हणाले, वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं…. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. फडणवीस यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता योग्य उत्तर देईल. राहुल गांधींना सावरकरांबदद्ल माहिती नाही. ते रोज खोटं बोलतात. किती काँग्रेस नेत्यांनी सावरकरांप्रमाणे ११ वर्ष यातना सहन केल्या, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना केला. या अपमानाचं उत्तर महाराष्ट्राची जनताच देईल, असं फडणवीस म्हणाले.

तर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राच थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

राहुल गांधींचं वक्तव्य काय?

मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले, सावरकर इंग्रजांकडून पेंशन घेत होते. काँग्रेसच्या विरोधात इंग्रजांसाठी काम करत होते. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या तुरुंगात राहिले. इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि काम करायला तयार आहे, असं म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.