AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिळे जुळण्याचा काळ गेला, आता खिळे मारण्याचा काळ सुरु : उद्धव ठाकरे

"पत्रकारितेची ताकद वाढती राहो," अशा शुभेच्छाही उद्धव ठाकरेंनी (CM uddhav Thackeray speech) दिल्या.

खिळे जुळण्याचा काळ गेला, आता खिळे मारण्याचा काळ सुरु : उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 05, 2020 | 7:43 PM
Share

मुंबई : मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आज (5 फेब्रुवारी) पार (CM uddhav Thackeray speech) पडला. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे.

“कॅबिनेटमध्ये महिलांवरील अत्याचार कसे थांबवायचे? काय करायचं? तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी कायदे केले. तो कायदा आणायचा का? नेमका तो कायदा काय कसा आणायचा? याबाबत अभ्यास सुरु आहे.”

“मात्र आम्ही सर्व पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की, महिलांवरील अत्याचार या सुसंस्कृत महाराष्ट्रात अजिबात सहन केले जाणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना उचला, आणा, फटकावायचं तर फटकवा आणि तातडीने त्यांच्यावर केस दाखल करा. तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे हा या सरकारच आग्रह आणि निग्रह आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता खिळे जुळण्याचा काळ गेला आहे. आता खिळे मारण्याचा काळ सुरु झाला आहे. विरोधकांनाही आता खात्री पटली असेल की आता सर्व कठीण आहे,” अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी (CM uddhav Thackeray speech) यावेळी केली.

“आयुष्यात विधानभवन-मंत्रालय आजूबाजूला फिरकलो नव्हतो. सभागृहात जे चाललं आहे, त्याला तुम्ही रोमान्स म्हणत असाल तर..” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणं खूप कठीण काम आहे. पण जर दोन घास पिकवणारा आत्महत्या करत असेल. तर आम्ही काय कामाचे,” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

“शिवसेनाप्रमुखांचा मुलगा, प्रबोधनकारांचा नातू, त्यामुळे पत्रकारिता ही आमच्या घराण्यात आहे. राजकारणात आल्यावर घराणेशाहीवर टीका झाली. पण काही काळ मी ही सामनाचा संपादक होतो. आता हे स्विकारल्यामुळे ते सोडावं लागलं. पण तिथे घराणेशाहीबद्दल सुदैवाने टीका केली नाही. ही टीका आम्ही सहन करत आलो, इतकंच नव्हे तर माझ्यावरही टीका झाली की भाषण करता येत नाही. अनेक लोक म्हणायचे की यांचे वडील किती चांगलं भाषण करतात,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“पत्रकारितेची ताकद वाढती राहो,” अशा शुभेच्छाही उद्धव ठाकरेंनी (CM uddhav Thackeray speech) दिल्या.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक