AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नागपूर महानगरपालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक  स्वबळावर लढवावी, अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. Congress leaders said they don't make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election

काँग्रेसचा एल्गार, नागपुरात राष्ट्रवादीशी आघाडी नाही, स्वबळाचा नारा
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 22, 2020 | 8:15 PM
Share

नागपूर: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी नागपूर महानगरपालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक  स्वबळावर लढवावी, अशी मागणी आता काँग्रेस नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेतील समीकरण नागपूर महानगरपालिका निवडणुकीत कायम राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Congress leaders said they don’t make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election)

नागपूर महापालिका भाजपचा गड समजला जातो. नागपूर महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ शिल्लक असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस आत्तापासूनच कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नागपूर शहरातून अनपेक्षित यश मिळालं होतं. शहरातील सहा पैकी दोन जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या. याचाच फायदा हा महानगरपालिका निवडणुकीत होऊ शकतो असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. २०१७ च्या तुलनेत आजच्या घडीला काँग्रेस पक्ष मजबूत दिसत असल्यानेच निवडणुकीपूर्वी युती होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे.

काँग्रेसनं 2012 ला सर्व पक्षांना साेबत घेऊन निवडणूक लढवली आणि 2017 ला स्वबळावर निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांचा अनुभव चांगला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करुन गेले. त्यांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे. मात्र, आम्ही महापालिकेत कशी सत्ता आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, काँग्रेसचे महासचिव संदेश सिंगलकर यांनी सांगितले.

राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी नागपूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत आघाडी करणार की स्वबळाचा पर्याय स्वीकारणार पाहावं लागणार आहे. सध्या महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. महापौर संदीप जोशी महापालिकेचा कार्यभार पाहत आहेत.

संबंधित बातम्या :

IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?

Tukaram Mundhe | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली

(Congress leaders said they don’t make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक