विशेष विमानाने काँग्रेस आमदार जयपूरवरुन मुंबईत, आता कुठे जाणार?

राज्यात फसलेला सत्तास्थापनेचा पेच आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

विशेष विमानाने काँग्रेस आमदार जयपूरवरुन मुंबईत, आता कुठे जाणार?
Follow us
| Updated on: Nov 13, 2019 | 6:34 PM

मुंबई: राज्यात फसलेला सत्तास्थापनेचा पेच आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर (Congress MLA return from Jaipur) येथे पाठवले होते. त्यानंतर आज हे सर्व आमदार विशेष विमानाने मुंबईत परतले (Congress MLA return from Jaipur) आहेत. त्यामुळे काँग्रेस आता काहीशी निश्चिंत झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे सर्व आमदार दुपारी चार वाजता विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले. या आमदारांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते विमानतळावर हजर होते. यात माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. सर्व आमदार एकत्र आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विमानतळावरच आमदारांशी काही काळ चर्चा केली. थोरातांनी या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर हे आमदार आपआपल्या घरी परतले आहेत.

महासेनाआघाडीचा ‘किमान समान कार्यक्रम’ काय असणार?

दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तास्थापन करताना महासेनाघाडीचं किमान समान कार्यक्रम काय असणार याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे आणि कोणते मुद्दे वगळायचे हे ठरवले जाईन. किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचं हेही या चर्चेत ठरावावं लागणार आहे. पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. त्यासाठी आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू. त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्ता वाटप सूत्र आणि शिवसेनेला पाठिंबा याबाबत चर्चा होईन.”

मुख्यमंत्रिपदाविषयी विचारणा केली असता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर बोलणं टाळलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाबाबत मी काहीही बोलणार नाही. सत्ता वाटपाच्या सूत्रात यावर चर्चेत निर्णय होईन.” शिवसेना आणि आमचं जुळू नये याचा भाजप प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.