… तर राम कदमांपर्यंत जावं लागेल, संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची प्रतिक्रिया

भाजपला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचं राजकारणच करायचं असेल तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल, अशी टीका काँग्रेस नेते मंत्री सुमील केदार यांनी केली.

... तर राम कदमांपर्यंत जावं लागेल, संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची प्रतिक्रिया
संजय राठोड आणि राम कदम
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 12:57 PM

नागपूर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्ष जरी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आक्रमक झालेला असला तरी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. ते या सगळ्या प्रकारावर बोलतीलच पण भाजपला या प्रकरणाचं राजकारणच करायचं असेल तर मग आम्हाला भाजपचे आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल, अशी टीका काँग्रेस नेते मंत्री सुनील केदार यांनी केली.  (Congress Sunil Kedar First reaction On Sanjay Rathod And pooja Chavan Suicide Case)

तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी तर राठोडांचा राजीनामा मागत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. या साऱ्या प्रकरणात शिवसेवा बॅटफूटला गेल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसच्या वतीने सुनील केदार यांनी या प्रकरणी पहिलीच कमेंट दिली आहे.

राठोड यांच्यासोबत काँग्रेस आहे काय?, सुनील केदार म्हणतात…

संजय राठोड यांच्यासोबत काँग्रेस आहे का?, या प्रश्नावर मंत्री सुनील केदार यांनी बोलणं टाळलं. या सर्व विषयावर मुख्यमंत्री बोलतील, असं ते म्हणाले. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. ते या सगळ्या प्रकारावर बोलतील, असं केदार म्हणाले.

…तर आम्हाला राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल!

“संजय राठोड विषयावर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. विरोधी पक्षाचं टीका करणे काम आहे. विरोधी पक्षाने विरोध करावा. विरोधी पक्षाने फक्त टीका करुन चालणार नाही. भाजपने समजा राजकारणच करायचं म्हटलं तर दूरपर्यंत जावं लागेल. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल. आम्हाला यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही”, असं सुनील केदार म्हणाले.

सुनील केदार यांचा रोख राम कदम यांच्याकडे का?

राम कदम आणि वाद हे जणू काही समीकरणच झालंय. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा प्रभू रामाचा एडिट केलेला फोटो किंवा पोरी पळवून नेण्याचं वक्तव्य… यावरून राम कदम नेहमीच वादात सापडलेत.

मुलगी पळवून आणून तिचे ‘त्या’ तरुणाशी लग्न लावून देईन : राम कदम

गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी युवकांसमोर बोलताना, ‘तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि ती तुम्हाला नकार देत असेल, तर ती मुलगी पळवून आणून तिचे त्या तरुणाशी लग्न लावून देईन’, असे बेताल वक्तव्य केले होते. यानंतर संबंध राज्यभर आमदार कदम यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता.

पाहा काय म्हणालेत सुनील केदार :

हे ही वाचा :

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर?; मुख्यमंत्र्यांना दिला पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचा रिपोर्ट!

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

संजय राठोड यांची हकालपट्टी करा, पूजा चव्हाण प्रकरणावरुन अतुल भातखळकर आक्रमक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.