AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत पडद्याआड घडामोडी, विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य चार उमेदवारांची नाव आली समोर

महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर 11 सदस्यांना निवडून पाठवण्यात येणार आहे. काँग्रेस विधान परिषदेच्या तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी कुठल्या चार उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली, ती नाव समोर आली आहेत. दिल्लीत काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत.

दिल्लीत पडद्याआड घडामोडी, विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या संभाव्य चार उमेदवारांची नाव आली समोर
नाना पटोलेImage Credit source: Facebook
| Updated on: Jun 25, 2024 | 2:49 PM
Share

(संदीप राजगोळकर) महाराष्ट्रात लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होणार आहेत. निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आजपासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. याच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबत झाली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत चर्चा केली. काँग्रेस विधान परिषदेच्या 11 पैकी 3 जागा लढवणार आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि विधान परिषद उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी काल रात्री उशिरा नाना पटोले दिल्लीत दाखल झाले.

काँग्रेसच्या बैठकीत ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली, त्यांची नाव टीव्ही 9 मराठीकडे आली आहेत. माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी आणि संध्या सव्वालाके या चार उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची महत्त्वाची पद भूषवली आहेत. नसीम खान हे महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असताना मंत्री होते. आता काँग्रेस चौघांपैकी कुठल्या तीन उमेदवारांना संधी देते, ते लवकरच समजेल.

बैठकीसाठी महाराष्ट्रातून कुठले नेते दिल्लीत?

दरम्यान थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेस मुख्यालयात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी आणि विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठीकत चर्चा होईल. बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी चार वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत होणार बैठक होईल.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.