प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अशी यादी दाखवलेय की….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनचा सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. या पाठोपाठ 80 हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. या दोन प्रकल्पांपाठोपाठ टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तसेच सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्पही आता हैदराबादला गेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प
- सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : 20 हजार कोटी रूपये
- सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प : नागपूर : गुंतवणूक : 378 कोटी रूपये
- महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड : गुंतवणूक : 375 कोटी रूप
- सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : 662 कोटी रूपये
- वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : 779 कोटी रूपये
- विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प : सोलापूर : गुंतवणूक : 126 कोटी रूपये
- आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प – पुणे : गुंतवणूक : 400 कोटी रूपये
- जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प : जळगाव : गुंतवणूक : 650 कोटी रूपये
- मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : 758 कोटी रूपये
या नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्तीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.