AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभूत झाल्यावर काय बोलायचं?, जयंत पाटलांची कव्हर फायरिंग सुरू; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपलाच विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळे पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

पराभूत झाल्यावर काय बोलायचं?, जयंत पाटलांची कव्हर फायरिंग सुरू; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
| Updated on: Nov 25, 2020 | 7:21 PM
Share

पुणे: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपलाच विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळे पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून ते कव्हर फायरिंग करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं आहे. पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चांगली झाली आहे. आपण आर्धी लढाई जिंकलो आहोत. त्यामुळेच जयंत पाटलांनी कव्हर फायरिंग सुरू केली आहे. जयंत पाटील अत्यंत हुशार नेते आहेत. समोर पराभव दिसू लागल्यावर त्यांनी लगेच कव्हर फायरिंग सुरू केली आहे. पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिसही त्यांनी सुरू केली असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

तर यांना ईव्हीएम आठवते

यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी बोगस मतदान होणार असल्याच्या विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला. बिहारमध्ये आपण जिंकायला लागलो तर यांना मंगळ ग्रह आठवतो आणि ते हरायला लागले की ईव्हीएम आठवते, असा टोला त्यांनी लगावला. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन नाहीत. त्यामुळे बोगस मतदान होणार असल्याची बोंब मारायला त्यांनी सुरुवात केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सविनय कायदेभंगासाठी तयार राहा

या सरकारच्या काळात प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. आम्ही सरकारमध्ये होतो. आमच्याविरोधातही सोशल मीडियावरून लिहिलं गेलं. पण आम्ही कुणाला त्रास दिला नाही. कुणाला तुरुंगात टाकलं नाही, असं सांगतानाच आता सविनय कायदेभंग करण्याची वेळ आली आहे. तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. अंगावर कितीही केसेस पडल्या तरी चालेल. घाबरू नका. ज्यांना घर नाही, दार नाही. संसार नाही. असा मोदींसारखा नेता आपल्या पाठिशी आहे, त्यामुळे घाबरू नका, असंही ते म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

  • ओबीसीचं आरक्षण घटनेनं दिलेलं आहे. त्याला कुणी हात लावू शकत नाही. आम्ही कुणालाही या आरक्षणाला हात लावू देणार नाही.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेची चौकशी लावण्यात आली. कितीही चौकश्या लावा, कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही घाबरणार नाही. सरकार जेव्हा नाकर्ते असते तेव्हा आम्ही प्रश्न विचारणारच. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा.
  • ज्या लोकांनी आपल्याला विजेचा शॉक दिला. त्या सरकारला निवडणुकीत शॉक द्या. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

संबंधित बातम्या:

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘मविआ’कडून जाती-पातीचं राजकारण : बावनकुळे

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

(devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.