AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला, मतदानावरील आरोपानंतर फडणवीसांची बोचरी टीका!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तसेच इतर राज्यांच्या निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. मतदारांची संख्या वाढवण्यात आली. मतदान संपल्यानंतर अचानक मतदार वाढले, एका मतदाराचे नाव दोन ते तीन राज्यांत आहे, असे गंभीर आरोप राहुल गांंधी यांनी केले.

राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला, मतदानावरील आरोपानंतर फडणवीसांची बोचरी टीका!
rahul gandhi and devendra fadnavis
| Updated on: Aug 07, 2025 | 5:35 PM
Share

Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तसेच इतर राज्यांच्या निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. मतदारांची संख्या वाढवण्यात आली. मतदान संपल्यानंतर अचानक मतदार वाढले, एका मतदाराचे नाव दोन ते तीन राज्यांत आहे, असे गंभीर आरोप राहुल गांंधी यांनी केले. तसेच हा आरोप करताना त्यांनी थेट पुरावेही दिले आहेत. राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता राहुल गांधींच्या याच आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींची हार्डडिस्क करप्ट झाली आहे, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.

राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली

खरं सांगायचं तर मतांची चोरी ही महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही झालेली नाही. राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून ते त्याच-त्याच गोष्टी रोज बोलत आहेत. ते खोटं बोलून पळून जात आहेत, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काहीतरी नवे सांगून ते लक्ष खेचण्याचा प्रयत्न

तसेच राहुल गांधी हे रोज वेगवेगळे आकडे देत आहेत. महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढले, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले आहेत, असा दावा करतायत. दरवेळी काहीतरी नवे सांगून ते लक्ष खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांची जमीन संपलेली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. बिहारमध्येही आम्हाला निवडून येता येणार नाही. महाराष्ट्रातील पुढच्याही निवडणुकीत आमचा विजय होणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे अगोदरच ते असा प्रकारची फायरिंग करून ठेवत आहेत, असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

….तर मतदार याद्यांत कशी सुधारण होईल?

बिहारमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन केले जात आहे. याला मात्र राहुल गांधी विरोध करत आहेत. या पुनरावलोकनासाठी मी 2012 साली याचिका दाखल केली होती. ते मात्र याला विरोध करत आहेत. असं असेल तर मतदार याद्यांत कशी सुधारण होईल? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी काय आरोप केला?

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका, मतदानाची प्रक्रिया यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रासह अन्य राज्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा घोळ घालण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. हा दावा करताना त्यांनी काही पुरावेही सादर केले. तसेच भाजपाच्या भूमिकेवरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.