AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: Eknath Shinde: उद्धव ठाकरेंविरोधात बंड का केलं? एकनाथ शिंदेंनी टी.व्ही.9 मराठीशी बोलताना दोन प्रमुख कारणे सांगितली

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेनी दिलेले आहेत.

Eknath Shinde: Eknath Shinde: उद्धव ठाकरेंविरोधात बंड का केलं? एकनाथ शिंदेंनी टी.व्ही.9 मराठीशी बोलताना दोन प्रमुख कारणे सांगितली
धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जाणार!Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 22, 2022 | 9:36 AM
Share

मुंबई: उद्धव ठाकरेंविरोधात बंड का केलं याची दोन प्रमुख कारणं एकनाथ शिंदेंनी टी.व्ही.9 मराठीशी बोलताना सांगितलीत.आम्ही बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackrey) मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे (Hinduttva) विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलंय. आमचा विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जायचा प्रयत्न असणार आहे असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेनी दिलेले आहेत.

माझ्याकडे 40 आमदार :

आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय.

उद्धव ठाकरेंविरोधात बंड का केलं? टी.व्ही.9 मराठीशी बोलताना कारणे सांगितली

ठाकरे सरकारचे अखेरचे काही तास?

एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल.

रात्रीतून काय घडलं?

कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.