AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे.

खडसेंचा करिष्मा! निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार, 18 नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश
eknath khadse bhusawal
| Edited By: | Updated on: Feb 14, 2021 | 6:39 AM
Share

जळगाव : जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण, त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. (eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळमधील 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथं राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे नेते आणि समर्थक उपस्थित होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण 31 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कारकेला. भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश आहे.

खरंतर, एकनाथ खडसेंनी शनिवारीच एका आयोजित मेळाव्यामध्ये भाजपला थेट इशारा दिला होता. यावेळी ”मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल. जेवढे मला छळाल, तेवढा तुमच्या बरोबर असलेला वर्ग तुम्हाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होईल”, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला होता. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीनं एक मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते.

नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल, यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. जिल्ह्यात कोणाकडून नोकरीसाठी किंवा भरतीसाठी एक रुपया घेतला नाही. असे असेल तर कुणी सांगावे, तोंडात शेण घालावे, असं म्हणत त्यांनी भाजपलाही खडे बोल सुनावले.

या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे: एकनाथ खडसे

दरम्यान, या गद्दारांना धडा शिकवला पाहिजे, एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या संवाद यात्रेत गिरीश महाजन यांच्यावर भडकले होते. पाच वर्षांच्या कालखंडात गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना एकावेळेसही नाथाभाऊंचा मतदारसंघ असल्यामुळे मुक्ताईनगरला फिरकले नाहीत. अरे हा दुष्काळी तालुका आहे. सिंचनाचा प्रश्न आहे. एक रुपया त्यांनी दिला नाही. मुक्ताईनगर अनेक सिंचनाचे प्रश्न तेव्हापासून रखडलेले आहेत. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून जामनेरमध्ये सिंचनाची कामे झाली नाहीत, त्या ठिकाणी जी कामे झाली असतील ते एकनाथ खडसे यांच्यामुळे झाली आहेत, अशीही टीका यावेळी एकनाथ खडसे यांनी केली. (eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

संबंधित बातम्या – 

LIVE : नाथाभाऊंचा दणका, भुसावळमध्ये भाजपला मोठा धक्का, 18 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडलं, या प्रकरणातही चौकशीत सत्य बाहेर येईल : हसन मुश्रीफ

काँग्रेसचं अस्तित्व संपलं, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावं, राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

(eknath Khadse 18 bjp corporators joined NCP with their families in bhusawal jalgaon)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.