AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मुंबईला कधी परत येणार? पत्रकारांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंकडून हसत हसत उत्तर, काय म्हणाले शिंदे?

गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू मध्ये गेल्या सहा दिवसांपासून असलेले एकनाथ शिंदे आज माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि विश्वास पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार ? असा प्रश्न विचारल्यानंतर शिंदे यांनीही हसून उत्तर दिलं.

Eknath Shinde : मुंबईला कधी परत येणार? पत्रकारांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंकडून हसत हसत उत्तर, काय म्हणाले शिंदे?
एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 4:36 PM
Share

मुंबई : तब्बल 9 दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) नाट्य आता अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना समोर येऊन बोला, चर्चेतून मार्ग काढू असं आवाहन केलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशावेळी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू मध्ये गेल्या सहा दिवसांपासून असलेले एकनाथ शिंदे आज माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि विश्वास पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार ? असा प्रश्न विचारल्यानंतर शिंदे यांनीही हसून उत्तर दिलं.

मुंबईला आम्ही लवकरच जातोय – शिंदे

एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईला आम्ही लवकरच जातोय. मात्र, त्याबाबत अद्याप कुठलीही तारीख निश्चित झालेली नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर आमच्या गटाचते प्रवक्ते दीपक केसरकर आहेत आणि वेळोवेळी ते आमची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवतील असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

मी आजही शिवसेनेत, शिंदेंचा पुनरुच्चार

मी आजही शिवसेनेत आहे. यात शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

‘सगळे अगदी आनंदात आहेत’

आमदारांना पळवून नेलंय. त्यांना बंदीवान केलंय. त्यांना मारहाण केल्याचा आरोपही शिवसेनेतून केला जात होता. हा आरोप एकनाथ शिंदे यांनी खोडून काढला. या ठिकाणी 50 आमदार आले आहेत. ते खूश आहेत, आनंदात आहेत. हे सर्व लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत. स्वार्थासाठी आले नाहीत. कुणाच्याही दबावाखाली आले नाहीत. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.