AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

Ajit Pawar : शिवसेनेच्या फुटीला वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता हा भूकंप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्यासोबत आला आहे. हा गट शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
| Updated on: Jul 02, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे ४० आमदार भाजपसोबत आले अन् राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. हे भारतीय जनता पक्षाचे ऑपरेशन लोट्स आहे. लवकरच गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

अजित पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये बंड केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ते बंड मोडून काढले होते अन् फडणवीस सरकार काही तासांत कोसळले होते. आता अजित पवार यांचे बंड पुन्हा शरद पवार मोडून काढणार? अजित पवार यांच्यांसोबत गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केली.

अजित पवार यांच्या गटातून कोण मंत्री

अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे मंत्री झाले आहेत. त्यातील छगन भुजबळ अन् दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे जवळचे असल्याचे समजले जात होते. परंतु ते ही आता अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणण्यात शरद पवार यांना यश येणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....