AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे.

Grampanchayat Election Result 2022: राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल, काय आहेत अपडेट्स?
ग्रामपंचायत निवडणूक Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 20, 2022 | 10:13 AM
Share

मुंबई,  राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायतीचे आज निकाल (Grampanchayat Election Result 2022) लागणार आहेत. मतमाेजणीला सकाळी 10 वाजता पासून सुरूवात हाेणार आहे. राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या आहेत, त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींसाठी आज मतमाेजणी हाेणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकींसाठी अनेक दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बच्चू कडू, बाळासाहेब थाेरात, विश्वजीत कदम, राणा जगजीतसिंह तसेच देवेंद्र भुयार यांसारख्या दिग्गजांची प्रतीष्ठा पणाला लागलेली आहे.

अशी आहे निवडणूकांची आकडेवारी

7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या हाेत्या त्यापैकी 7 हजार 681 ग्रामपंचायतींंमध्ये निवडणूका पार पडल्या.  राज्यातील एकूण 590 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविराेध झाल्या तर 72 ग्रामपंचायतींच्या निवडणूका वेगवेगळ्या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या हाेत्या.

बिनविराेध पार पडलेल्या एकूण 590 ग्रामपंचायती पैकी ठाकरे गटाचे 65, शिंदे गटाचे 103, भाजपचे 149, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 108, काँग्रेसच्या 54 आणि इतर 111 जागांवर  बिनविराेध पार पडल्या.

बिड जिल्हातील नाथरा या गावी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. आमदार विश्वजीत कदम यांचे गाव असलेल्या साेनसळमध्ये देखील आज मतमाेजणी हाेणार आहे.

अहमदनगर जिल्हातील जाेरवे या गावात देखील निवडणूक पार पडली. या निवडणूकीमध्ये बाळासाहेब थाेरात यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. राणा जगजीतसिंह यांच्या उस्मानाबाद जिल्हातील तेर या गावीदेखील निवडणूक पार पडली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्दमध्येदेखील निडणूक पार पडली आहे.

भाजप  नंबर एकचा पक्ष असल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा दावा

ग्रामपंचायत भाजप निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केला आहे. भाजप आणि शिंदे गटाने 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिंदे गटाने 40 पेक्षा जास्त सरपंचपदं मिळवल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत 125-130 जागा जिंकल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. मित्रपक्षांसह 150 जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.