AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं – गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच आम्ही केवळ पक्ष वाचवण्यासाठीच उठाव केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Gulabrao Patil : लोक सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत आम्ही मंत्रीपदे सोडली; जे केलं ते शिवसेना वाचवण्यासाठीच केलं - गुलाबराव पाटील
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 06, 2022 | 11:18 AM
Share

जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडल्याचे पहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (shiv sena) बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मोठ्यासंख्येने आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले. ठाकरे सरकारकडे बहुमत नव्हते. अखेर विश्वासदर्शक ठारावाच्या आधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सर्व घडामोडींना कोण जबाबदार यावरून आता शिवसेना नेते आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून एकोनएकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणावर बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला, असे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे आहे.

नेमकं काय म्हटलंय पाटलांनी?

राज्यात सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर गुलाबराव पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही उद्धव ठाकरेंना आमदारांच्या नाराजीची वेळोवेळी माहिती दिली, पण त्यांनी कधी समजून घेतलं नाही. शेवटी शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला. लोक ग्रामपंचायत सरपंचाची खुर्ची सोडत नाहीत. आम्ही मंत्रिपदे सोडून उठाव केला. एक नाही तर 8 मंत्रिपदे सोडली, शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केला आहे. अशा शब्दांत आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान विशेष अधिवेशनावेळी देखील त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता. शदर पवार यांचं एवढं वय झालं आहे तरी देखील ते सातत्याने राज्यात फिरत असतात. जयंत पाटील माझ्या मतदारसंघात येऊन गेले. एकनाथ शिंदे देखील आले. मात्र आम्हालाही वाटतं आमचे नेते मतदाससंघात यावेत मात्र तसं कधीही घडल नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हलटे होते.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

दरम्यान विशेष अधिवेशनात बोलताना गुलाबराव पाटील यांनी चहापेक्षा किटली गरम म्हणत आदित्य ठाकरे यांना देखील डिवचले होते. संवादाचा अभाव होता. कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात नव्हता. मतदारसंघात कधी नेतृत्व फिरकल नाही. तसेच हिंदुत्वासाठी भाजप, शिवसेना एकस येणे गरजेचे होते म्हणून आम्ही बाहेर पडलो असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत