चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

| Updated on: Nov 03, 2020 | 12:44 PM

मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे.

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच
Follow us on

कोल्हापूर: मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) यांच्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी टीका केली आहे. चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही. उलटं मी काल जे बोललो त्याला त्यांनी पृष्टीच दिली आहे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. (Hasan Mushrif reaction on chandrakant patil statement)

हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्याची आश्यकता नाही. त्यांना हिमालयात जावे लागणार नाही. जी गोष्ट होणार नाही, ती करा असं म्हणणं बरोबर नाही. उलट माझ्या कालच्या वक्तव्यावर त्यांनी पृष्टी केली आहे. राज्यपालांबाबतच्या माझ्या वक्तव्याचं त्यांनी खंडन केलं नाही, असं सांगतानाच कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल चंद्रकांतदादांवर टीका केली नव्हती. त्यांची इथं आम्हाला गरज आहे, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

मुश्रीफ काय म्हणाले होते?

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. “माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं मुश्रीफ म्हणाले होते.

पाटील यांनी फेटाळला होता आरोप

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचा हा दावा फेटाळून लावला होता. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झालंय. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशाठिकाणी मी कसं असं बोलेन?” असं पाटील म्हणाले होते.

तसेच, चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असं ते म्हणाले होते. (Hasan Mushrif reaction on chandrakant patil statement)

संबंधित बातम्या:

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट