AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने  महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, अशा शब्दात उदय सामंत यांनी भाजपला ललकारले आहे. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना भाजपवर थेट हल्लाबोल केला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 40 नेत्यांना मंत्रिपद दिलं तरी ते शिवसेनेला संपवू शकत नाहीत. जन आशीर्वाद यात्रेचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. जन आशीर्वाद रॅली ही कशी सुरू झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बीडमध्ये पाहिलचं आहे, असा चिमटा सामंत यांनी काढला.

प्रशासन आपलं काम करेल

कोरोना संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनीच कोव्हिडंचे नियम पाळले पाहिजेत. खुद्द पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका आहे. तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जर त्यामध्ये कोणी अतिरेक करत असेल तर प्रशासन त्यांचं काम करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशाचं नेतृत्व करण्यासाठीचा कौल

एका वृत्तवाहिनीने देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॉप फाईव्हमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि सध्या ते ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व करत आहेत, त्यावरून त्यांनी देशाचंही नेतृत्व करावं, असाच कौल या सर्व्हेतून आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेला निमंत्रण

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

संबंधित बातम्या:

जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी : काँग्रेस

भोळ्या भाबड्या महादेवाला तांबे-पितळाचा 5 क्विंटलचा साज, डोळ्यात भरणारं ‘सुवर्ण रुप!’

(Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

Follow Us
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?