AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत नियम पाळू शकतात, तर मग आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का? : इम्तियाज जलील

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी बकरी ईदनिमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline).

मोदी 5 ऑगस्टला अयोध्येत नियम पाळू शकतात, तर मग आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का? : इम्तियाज जलील
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 23, 2020 | 3:35 PM
Share

मुंबई : “कोरोनाचे नियम फक्त आम्हालाच आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला जाणार आहेत, मग ते चालतं का? ते नियम पाळू शकतात, तर आम्ही नियम पाळून सण साजरे करु शकत नाही का?”, असे प्रश्न एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले आहेत (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline). इम्तियाज जलील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नियम आणि अटी ठेवून सरकारने देशातील सर्व धार्मिक स्थळे उघडावी, असं मत व्यक्त केलं.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी बकरी ईदनिमित्ताने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. “सरकारने प्रतिकात्मक बकरी ईद कशी साजरी करायची हे जरा समजावून सांगावं. तुम्ही हुकूमशाहासारखे आदेश काढायचे आणि लागू करायचे. तुम्ही नियम अटी घालून मंदिर-मशीद उघडा”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मी फक्त ईदबाबत बोलतोय असं नाही. अन्य सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. तर मंदिर-मशीद सुरु करण्यात काही हरकत नसावी. ऑगस्टमध्ये सणवार जास्त आहेत, गणेशोत्सव येतोय, बकरी ईद आहे, सर्व धार्मिक स्थळं उघडा”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“चार महिने झाले मंदिर-मशिदी धार्मिक स्थळं बंद आहेत, पण लोकांची ही श्रद्धास्थानं आहेत, वयस्करांसाठी तर हे आवश्यक आहे, नियम अटी ठेवल्या तर सर्व सुरळीत होऊ शकतं”, असं इम्तियाज जलील म्हणाले.

“प्रतिकात्मक बकरी ईद कशी साजरी करणार? मंदिरामध्ये कोणीही 3 मिनिटांपेक्षा जास्त थांबत नाहीत. तुम्ही नियम अटी टाकून हे सुरु करु शकता. तुम्ही संविधानाविरोधात नियम का लागू करताय? तुमची हुकूमशाही का?”, असे सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले (Imtiaz jaleel ask question on bakri eid festival guideline).

दरम्यान, “अयोध्येच्या राम मंदिराला आमचा विरोध नाही. सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे. पण पंतप्रधानांना प्राथमिकता कळायला हवी. सध्या कोरोना आहे. मंदिर तीन महिने उशिरा बांधलं तर चालणार नाही का?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

संबंधित बातम्या :

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक