AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले राजू पाटील यांना त्यांच्या गावातून एकही मत मिळालं नाही, पण वास्तवात सत्य वेगळच

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभेत बोलताना माजी आमदार राजू पाटील यांच्या गावाच उदहारण दिलं होतं. राजू पाटील यांच्या गावची लोकसंख्या 1400 आहे, तिथून त्यांना एकही मत मिळालं नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती या उलट आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले राजू पाटील यांना त्यांच्या गावातून एकही मत मिळालं नाही, पण वास्तवात सत्य वेगळच
Raj Thackeray-Raju Patil
| Updated on: Jan 31, 2025 | 8:00 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल वरळी येथे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे प्रथमच बोलले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. याआधी 2009 साली पहिल्या विधानसभा निवडणुकीत एकाचवेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. पण 2024 मध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. मनसेच मतदान मोठ्या प्रमाणात घटलं.

या विधानसभा निवडणूक निकालाच विश्लेषण करताना पक्षाची पिछेहाट झाली, हे राज ठाकरे यांना मान्य नाहीय. “लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते मतदान आपल्यापर्यंत आलचं नाही” असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. अप्रत्यक्षपणे ते अन्य पक्षांप्रमाणे पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार ठरवत आहेत. EVM मध्ये काहीतरी गडबड आहे, असं त्यांना सुचवायच आहे. मनसेच्या पराभवाच विश्लेषण करताना त्यांनी काही उद्हारण दिली. त्याचा पाठपुरावा केला असता, राज ठाकरे यांच्या दाव्यात तथ्य आढळून आलं नाही.

राजू पाटील यांच्या गावाबद्दल राज ठाकरेंच विधान काय?

“राजू पाटील यांचं एक गाव आहे, पाटलांच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होतं. 1400 लोकं त्या गावात राहतात. त्यांना किती मत मिळाली. अख्ख्या गावाच मतदान त्यांना होतं. त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळाल नाही. अख्ख्या गावातून एक मत नाही पडलं, जी 1400 मतं राजू पाटील यांना मिळायची, तिथे एक मत मिळत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचा चुकीची माहिती कोणी दिली?

राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर टीव्ही 9 मराठीची टीम कल्याण ग्रामीणचे मनसे उमेदवार व माजी आमदार राजू पाटील यांच्या काटई गावात पोहोचली. गावात एकूण 1,470 मतदार आहेत. तीन मतदान केंद्रावर राजू पाटील यांना गावातून 683 मते मिळाली. गावातील मतदान यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. काल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांच्या गावच उदहारण दिलं होतं. ‘राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी दिली?’ असा गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सवाल

Follow Us
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.