AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांता गेला हे दुर्देवी, पण आगामी उद्योगांचं काय ? शिंदे सरकारमधील मंत्र्याचं उत्तर अन् विरोधकांना सल्लाही..!

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

वेदांता गेला हे दुर्देवी, पण आगामी उद्योगांचं काय ? शिंदे सरकारमधील मंत्र्याचं उत्तर अन् विरोधकांना सल्लाही..!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 4:48 PM
Share

पुणे :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्प हा काही दोन महिन्यांमध्येच माघारी गेला असे नाही, तर (MVA) महाविकास आघाडी सरकारनेही सोई-सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. महाविकास आघाडी हे पाप आता राज्य सरकारच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वकाही दोन महिन्यातच झाले असे नाही, यासाठी मोठी पार्श्वभूमी आहे असा दावा (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. असे असतानाही वेदांता प्रकल्प हा परराज्यात जाणे हे दुर्देवी आहे. यामुळे राज्यावर काही थेट परिणाम होणार नाही तर आगामी 6 महिन्यात वेगवेगळे प्रकल्प राज्यात नव्याने येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यात आणि केंद्रातही सत्ता असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत हे वेगवेगळे प्रोजेक्ट राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ते एक बरं झालं..!

वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, सध्याचे राज्य सरकार हे गतिमान असल्याचे म्हणत त्यांनी टोलाही लगावला. पण शरद पवार यांनीच दोन मुख्यमंत्र्यांमधला फरक सांगितला हे एक बरे झाले, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. शिवाय वेदांता प्रकल्प हा गुजरातला यामध्ये राज्य सरकारच दोषी असे नाही तर सुरवातीपासून नेमके काय झाले होते हे देखील पाहणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

भविष्यात उद्योग येतील पण आताचे काय..?

वेदांता प्रकल्प गेला तरी आगामी काळात अनेक उद्योग राज्यात आणू असे आश्वासन दिले जात आहे. पण हे केवळ एक गाजर असून हा प्रकल्प गेलाच कसा आणि तो परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवाय याबाबत योग्य पाऊल उचलले गेले नाहीतर राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....