AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?
ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2022 | 3:58 PM
Share

बुलढाणा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. अशा विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं. राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही. महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. हे वास्तव आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल. महाविकास आघाडी अस्थिर होईल असं सांगितलं जात आहे. त्यांनी सांगितलं नाही. हा वेगळा विचार आहे. चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

काही राजकीय पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावरून उगाचच वातावरण तापवत आहेत. त्यांनी वातावरण तापवू नये. ऐतिहासिक सत्य समजून घ्यावं. या संघटना, पक्ष ऐतिहासिक सत्य का नाकारत आहेत? असा सवालही त्यांन केला.

आम्ही कधीच इतिहासाची मोडतोड केली नाही. काँग्रेस नेहमी इतिहासाशी प्रमाणिक राहिली आहे. सर्वात आधी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर 1942 च्या भारत छोडो, चले जाव चळवलीलाही विरोध केला होता, हे सत्य आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होतं हे सत्य कसे नाकारता? असा सवाल त्यांनी केला.

भारत जोडो यात्रेत बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंत ते स्त्रियांवरील अत्याचारापर्यंतचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. पण या मुद्द्यांकडे का लक्ष दिलं जात नाही. हा एकच मुद्दा का धरून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.