AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?
ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2022 | 3:58 PM
Share

बुलढाणा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. अशा विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं. राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही. महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. हे वास्तव आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल. महाविकास आघाडी अस्थिर होईल असं सांगितलं जात आहे. त्यांनी सांगितलं नाही. हा वेगळा विचार आहे. चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

काही राजकीय पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावरून उगाचच वातावरण तापवत आहेत. त्यांनी वातावरण तापवू नये. ऐतिहासिक सत्य समजून घ्यावं. या संघटना, पक्ष ऐतिहासिक सत्य का नाकारत आहेत? असा सवालही त्यांन केला.

आम्ही कधीच इतिहासाची मोडतोड केली नाही. काँग्रेस नेहमी इतिहासाशी प्रमाणिक राहिली आहे. सर्वात आधी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर 1942 च्या भारत छोडो, चले जाव चळवलीलाही विरोध केला होता, हे सत्य आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होतं हे सत्य कसे नाकारता? असा सवाल त्यांनी केला.

भारत जोडो यात्रेत बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंत ते स्त्रियांवरील अत्याचारापर्यंतचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. पण या मुद्द्यांकडे का लक्ष दिलं जात नाही. हा एकच मुद्दा का धरून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी केला.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....