AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल.

ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?
ठाकरे गटाने इशारा देताच काँग्रेस बॅकफूटवर; जयराम रमेश यांची सारवासारव काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2022 | 3:58 PM
Share

बुलढाणा: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटानेही राहुल गांधी यांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. अशा विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हे विधान केलं. राहुल गांधी यांच्या विधानाशी महाविकास आघाडीचं काही घेणंदेणं नाही. महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. हे वास्तव आहे, असं जयराम रमेश म्हणाले.

महाविकास आघाडीला तीन वर्ष झाली आहे. आधी शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळे लढत होते. राजकीय विरोधक होतो. राहुल गांधी यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी कमकुवत होईल. महाविकास आघाडी अस्थिर होईल असं सांगितलं जात आहे. त्यांनी सांगितलं नाही. हा वेगळा विचार आहे. चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

काही राजकीय पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावरून उगाचच वातावरण तापवत आहेत. त्यांनी वातावरण तापवू नये. ऐतिहासिक सत्य समजून घ्यावं. या संघटना, पक्ष ऐतिहासिक सत्य का नाकारत आहेत? असा सवालही त्यांन केला.

आम्ही कधीच इतिहासाची मोडतोड केली नाही. काँग्रेस नेहमी इतिहासाशी प्रमाणिक राहिली आहे. सर्वात आधी सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तर 1942 च्या भारत छोडो, चले जाव चळवलीलाही विरोध केला होता, हे सत्य आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होतं हे सत्य कसे नाकारता? असा सवाल त्यांनी केला.

भारत जोडो यात्रेत बेरोजगारीपासून ते महागाईपर्यंत ते स्त्रियांवरील अत्याचारापर्यंतचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. पण या मुद्द्यांकडे का लक्ष दिलं जात नाही. हा एकच मुद्दा का धरून ठेवला आहे? असा सवालही त्यांनी केला.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.