AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंपनीला जे सांगितलं तेच कंपनीने ट्विट केलं; महाराष्ट्राला गाजर का दाखवतायेत? जयंत पाटलाचा वेदांतावरून हल्लाबोल

वेदांता प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. आता यावरून विरोधकांनी शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला चांगलचं कोंडीत पकडलं आहे.

कंपनीला जे सांगितलं तेच कंपनीने ट्विट केलं; महाराष्ट्राला गाजर का दाखवतायेत?  जयंत पाटलाचा वेदांतावरून हल्लाबोल
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2022 | 3:01 PM
Share

कोल्हापूर :  वेदांता प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. आता यावरून विरोधकांनी शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला चांगलचं कोंडीत पकडलं आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. वेदांता महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले होते.  मात्र वीस दिवसांमध्ये असं काय झालं की हा प्रकल्प थेट गुजरातला गेला असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.

दुसऱ्या प्रकल्पांना मर्यादा

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने महाराष्ट्रात होणारी मोठी गुंतवणूक गेली आहे. आता त्याबदल्यात हे देतो ते देतो म्हणून महाराष्ट्राला गाजर दाखवण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या प्रकल्पांना मर्यादा आहेत. मागील वीस दिवसांमध्ये असं काय झालं की, प्रकल्प गुजरातला गेला. असं पहिल्यांदाच घडत आहे.

ज्यांनी राज्यात प्रकल्प आणला होता तेही आता ट्विट करून माहिती देत आहेत. म्हणजे त्यांना जे बोलायला सांगितले आहे तसंच ट्विट त्यांनी केलं आहे. गुजरातमधील तरुणांना सांगण्यासाठीच हा प्रकल्प तिकडे नेला असावा अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र आता हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांना सहकार्य करू असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

‘हिदुत्त्ववादी सरकारच्या राज्यात साधूवर हल्ले’

दरम्यान साधूंवर झालेल्या हल्ल्यावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सरकार पाडणाऱ्यांच्या काळात आता साधूंवर हल्ले होऊ लागले आहेत. ही दुर्दैवी घटना आहे. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा नसतो असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं