AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदार अस्थिर करण्यासाठी बातम्या पेरल्या जाताहेत; जयंत पाटलांचा आरोप

Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बातम्या पेरल्या आहेत. पण कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. त्यामुळे अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो.

Rajya Sabha Election 2022:  अपक्ष आमदार अस्थिर करण्यासाठी बातम्या पेरल्या जाताहेत; जयंत पाटलांचा आरोप
अपक्ष आमदार अस्थिर करण्यासाठी बातम्या पेरल्या जाताहेत; जयंत पाटलांचा आरोपImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 11:28 AM
Share

मुंबई: राज्यसभेसाठी मतदान  (Rajyasabha Election) सुरू होताच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे (anil bonde) यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (ncp) ऐनवेळी आपल्या मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 42 वरून 44 करण्यात आल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आघाडीत बिघाडी झाल्याच्या त्यानंतर बातम्या पसरल्या आहेत. मात्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. भाजपकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मीडियाशी संवाद साधून अफवांवर भाष्य केलं आहे. अपक्ष आमदार संभ्रमित व्हावेत, अस्थिर व्हावेत म्हणून बातम्या पेरल्या जात आहेत, असं जयंत पाटली यांनी म्हटलं आहे. तसेच आमचा कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. अफवांवर जाऊ नका, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बातम्या पेरल्या आहेत. पण कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. त्यामुळे अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो. पण आमची बेरीज पाहिली तर आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असं सांगतानाच दावा नेहमीच भाजप करत आलंय संध्याकाळी निर्णय लागेल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

एमआयएमवर संध्याकाळी बोलणार

आघाडीकडून एकत्रित मतदान केलं जात नाही, त्यावरही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आघाडीची स्ट्रॅटेजी सांगितली. आघाडी एकत्रित आहे. टप्याटप्याने मतदान कसं करायचं ही आमची स्ट्रॅटेजी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एमआयएमवर मी संध्याकाळी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मलिक, देशमुखांवर अन्याय

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदानासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदानापासून मुकावं लागणार आहे. त्यावरही पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मतदान करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे, असं सांगतानाच उच्च न्यायालयाकडून या दोन्ही नेत्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.