AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपनेच पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप

मशाल चिन्हावर समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मशाल चिन्हावर घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.

भाजपनेच पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोप
भाजपनेच पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा खळबळजनक आरोपImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 11:38 AM
Share

भूषण पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी शिवसेना फुटीवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप सत्तेविना राहू शकत नाही. म्हणून पडेल ती किंमत देऊन भाजपने शिवसेना फोडली आहे. शिवसेना (shivsena) फोडल्यानंतर कोणावर तरी खापर फोडायचे म्हणून राष्ट्रवादीचं (ncp) नाव घेतलं जात आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. जयंत पाटील आज कोल्हापुरात आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या आमदारांनी माझं नेहमी स्वागतच केलंय.प्रोफेशनली आपल्याला टिकायचं असेल तर पुढचा पक्ष प्रोफेशनली फोडला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीच नावं घेतलं जातंय. उद्धव ठाकरे यांच्या घरातली शिवसेना चोरीला गेली. आता ती कुणाच्या घरात सापडेल हे थोड्या दिवसात कळेल. शिवसेना फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. हिंदुत्वाची मतं जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच त्यांनी पक्ष फोडला, असं जयंत पाटील म्हणाले.

शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती. ती भाजपप्रणित होती. शिवसेना फोडण्यात भाजपचा आहे हे यातून स्पष्ट होतं. बाळासाहेबांचं नाव शिंदे यांना मिळालं यावरूनच किती मॅन्यूप्युलेटेडपणे काम चाललंय हे दिसतं, असंही ते म्हणाले.

ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम दाम दंड भेद वापरून फोडणे योग्य आहे का? या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जनमताची छोटीशी चाचणी होणार आहे. उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मशाल चिन्हावर समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मशाल चिन्हावर घेण्यात आलेल्या आक्षेपाबाबत मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. रस्ते, वीज, पाणी नैसर्गिक संसाधने कमी पडू लागली आहेत. सर्वांचे एकमत करून यावर निर्णय घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. मात्र शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना जन्म दिला आहे. त्यामुळे शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेला अशा भावना व्यक्त करायला परवानगी दिली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Follow Us
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय