AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ सवालाने अजित दादा गटाची दांडी गूल?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला महत्त्वाचा सवाल केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीच वाद नव्हता. पक्षात कधीच दोन गट नव्हते. तसेच शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला अजित पवार यांचं समर्थन होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार गटाला एक महत्त्वाचा सवाल केला.

जितेंद्र आव्हाड यांच्या 'त्या' सवालाने अजित दादा गटाची दांडी गूल?
ajit pawar and jitendra awhad
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 24, 2023 | 7:44 PM
Share

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगात आज शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केल्याची माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून पक्षात कधीच वाद नव्हता. तसेच शरद पवार यांनी अध्यक्षपदाला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं समर्थन होतं. त्यामुळे या सुनावणीला काही अर्थ नाही. ते त्यांच्या स्वार्थासाठी सत्तेत सहभागी झाले आहेत, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.

अगोदरच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र संदर्भात युक्तिवाद केला होतो. शरद पवार यांनी अध्यक्ष होण्यासाठी कोणी प्रस्ताव दिला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी गटाने केला. इंदिरा गांधी आणि ब्रह्मानंद रेड्डी केसप्रमाणे निवडणूक आयोगाने पक्षातील वाद दिसायला हवा. दोन गटात वाद दिसायला हवा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा यांनी राजीनामा परत घ्यायला लावला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा अजित पवार यांनी राजीनामा परत घ्यायला का लावला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“ब्रम्हानंद रेड्डी विरुद्ध इंदिरा गांधी केसचा संदर्भ घेण्यात आला आहे. वाद हा अचानक होत नसतो. त्याला पार्श्वभूमी असते. मात्र इथे तसं नाही. 1999 नंतर आमचा पक्ष पुढे कसा गेला, याबाबत माहिती दिली. 2020 साली कोरोना होता म्हणून त्यावेळी पक्षात निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर मात्र निवडणूक झाली”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“एका रात्रीत नवरा बायकोला सुद्धा घटस्फोट मिळत नाही. त्यासाठी देखील कलावधी जातो. मग इथ कसं शक्य आहे की एका दिवसांत यांचा वाद झाला? वाद हा पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे. शरद पवार यांनी कष्टाने पक्ष निर्माण केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून पक्ष तयार केला. एखाद्या मुलाप्रमाणे संगोपन केलंय. मग वाद नेमका कुठे झाला. हा वाद पक्षाचा नाही तर सत्तेचा आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच “अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Follow Us
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....