AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

...तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
| Updated on: Oct 31, 2020 | 7:46 PM
Share

ठाणे : “अंबरनाथ महापालिका निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत लढण्याला प्राधान्य असेल. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (31 ऑक्टोबर) अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी सभागृहात हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते.

“आगामी अंबरनाथ पालिका निवडणूक ही शिवसेनेला मोठा भाऊ मानून आणि काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र लढण्याची आमची तयारी आहे. पण तसं झालं नाही तर स्वबळावर लढण्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

या मेळाव्यात अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कामांचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये एकहाती टिकवण्याचं काम सदाशिव पाटील यांनी केलं आहे, असं आव्हाड म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज झालेल्या या प्रवेशामुळे शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात शहरात 12 ते 15 जागा निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे”, असं सदाशिव पाटील यावेळी म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी कबीर गायकवाड आणि कृष्णा रसाळ पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा सन्मान राखा, त्यांच्याविषयी वाईटसाईट बोलू नका; रोहित पवारांनी ट्रोलिंग करणाऱ्यांचे कान उपटले

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.