AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

...तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 31, 2020 | 7:46 PM
Share

ठाणे : “अंबरनाथ महापालिका निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस पक्षासोबत लढण्याला प्राधान्य असेल. मात्र, स्वबळावर लढण्याची वेळ आली तर त्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (31 ऑक्टोबर) अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी सभागृहात हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते.

“आगामी अंबरनाथ पालिका निवडणूक ही शिवसेनेला मोठा भाऊ मानून आणि काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र लढण्याची आमची तयारी आहे. पण तसं झालं नाही तर स्वबळावर लढण्याचीदेखील आमची तयारी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Ambernath Municipal election).

या मेळाव्यात अंबरनाथमधील माजी नगरसेवक कबीर गायकवाड, भाजपचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील आणि राष्ट्रवादीचे पूर्वीचे पदाधिकारी भालचंद्र भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कामांचं कौतुक केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये एकहाती टिकवण्याचं काम सदाशिव पाटील यांनी केलं आहे, असं आव्हाड म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज झालेल्या या प्रवेशामुळे शहरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात शहरात 12 ते 15 जागा निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे”, असं सदाशिव पाटील यावेळी म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे यावेळी कबीर गायकवाड आणि कृष्णा रसाळ पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा सन्मान राखा, त्यांच्याविषयी वाईटसाईट बोलू नका; रोहित पवारांनी ट्रोलिंग करणाऱ्यांचे कान उपटले

Follow Us
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?