AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे.

Pune : राष्ट्रपतींच्या शपथ सोहळ्यात शाकाहारीच भोजन ठेवा; पुण्यातून ई-मेलद्वारे आग्रह
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Image Credit source: tv9 marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 22, 2022 | 3:41 PM
Share

पुणे : पुणे तिथे काय उणे…ही म्हणीला अगदी तंतोतंत कृत्यही पुणेकरांनी केलेले आहेत. त्यामुळे याला विशेष महत्वही आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे हे पुणेकरांचे वैशिष्ट राहिलेले आहे. आता (The President ) राष्ट्रपतींच्या शपथविधीवरुन पुणे चर्चेत आले आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून (Draupadi Murmu) द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्यामुळे 25 जुलै रोजी (Swearing-in ceremony) शपथग्रहण सोहळा पार पडत आहे. नवनियुक्त नियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या अध्यात्मिक आहेत तर त्या शुध्द शाकाहारी देखील असून या सोहळ्यात स्नेहभोजन हे शुद्ध शाकाहारी असावे अशी मागणीच शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. त्यामुळे या अनोख्या मागणीची खमंग चर्चा आता रंगू लागली आहे. यासंदर्भात गंगवाल यांनी संबंधित विभागांना मेलही केले आहेत.

शाकाहाराचे महत्व जगाला कळेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे. भारतीय शाकाहाराची जगभर माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे निमित्त राहणार आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीचेही दर्शन घडेल असा विश्वास शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना आहे. त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार तर केला आहे. त्यावर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

नेमका आग्रह कशामुळे?

भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून काल द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील महिलेची निवड ही सर्वोच्चपदी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या अध्यात्मिक आहेत. शिवाय त्या मंसाहार करीत नसून शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात केवळ शाकाहारीच असेच जेवण ठेवावे अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे आता पहावे लागणार आहे.

25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा

राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी निवडीचा निकाल लागला असून आता 25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा होत आहे. त्याअनुशंगाने परदेशातील पाहुणे आणि देशभरातून राजकीय नेते हे उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, सर्व उपस्थितांसाठी शाकाहारच जेवण करण्याची मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली तर ते एक शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?