कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे राज्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पंचगंगा आणि कृष्णा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा फटका बसलाय. दरम्यान, राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असली तरी अद्याप ती पोहोचली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 23 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. (Raju Shetty is aggressive on issue of flood affected citizens)