Udhav Thakeray On Koshyari | कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलंय; उद्धव ठाकरे संतापले

Udhav Thakeray On Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Udhav Thakeray On Koshyari | कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलंय; उद्धव ठाकरे संतापले
ठाकरे यांची सडकून टीकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:50 PM

Udhav Thakeray On Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat sing Koshyari) यांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांनी केला आहे. काल एका कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई (Mumbai)आर्थिक राजधानी नाही, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा नुसता समाचारच घेतला नाही तर त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवत त्यांनी महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट फाडण्याचं नीच काम केल्याची घणाघाती टीका केली. ‘मराठीच नाही तर अमराठी हिंदूंनीही राज्यपालांच्या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तेही चिडले आहेत. असं कधी झालं नव्हतं आणि असं होता कामा नये, असं लोक म्हणत आहे. कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं.’ असं संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान या वक्तव्याच्या समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस यांच्या भूमिकेवरही सडकून टीका केली. त्यांचे नवनीतीचे हिंदुत्व असून त्याला नुकतेच अंकूर फुटले आहे. या नव्या सरकारची राज्यपालांच्या वक्तव्यावर काय भूमिका आहे असा तिरकस सवाल त्यांनी विचारला. ‘ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे.’ असा जाब त्यांनी राज्यातील नव्या सरकारला विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

हे द्वेषाचे राजकारण पेरत आहेत

राज्यपाल पदाचा कोश्यारी यांना मान नाही, त्यांना आदर नाही. ते सारखं जातीपातीत आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असल्याचा आरोप ही ठाकरे यांनी लावला. ते मराठी माणसाचा अपमान करत असतील आणि त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा अशी हिंदू म्हणून मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दल हिणकस उद्गार काढले याची आठवण करुन देत राज्यपाल कोश्यारी यांचं पार्सल कुठून तरी पाठवल्याची खोचक टीका ही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.