AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thakeray On Koshyari | कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलंय; उद्धव ठाकरे संतापले

Udhav Thakeray On Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Udhav Thakeray On Koshyari | कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलंय; उद्धव ठाकरे संतापले
ठाकरे यांची सडकून टीकाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 30, 2022 | 1:50 PM
Share

Udhav Thakeray On Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat sing Koshyari) यांनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं. हिंदू म्हणून एकवटलेल्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांनी केला आहे. काल एका कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई (Mumbai)आर्थिक राजधानी नाही, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा नुसता समाचारच घेतला नाही तर त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडवत त्यांनी महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये फूट फाडण्याचं नीच काम केल्याची घणाघाती टीका केली. ‘मराठीच नाही तर अमराठी हिंदूंनीही राज्यपालांच्या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तेही चिडले आहेत. असं कधी झालं नव्हतं आणि असं होता कामा नये, असं लोक म्हणत आहे. कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलं.’ असं संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान या वक्तव्याच्या समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस यांच्या भूमिकेवरही सडकून टीका केली. त्यांचे नवनीतीचे हिंदुत्व असून त्याला नुकतेच अंकूर फुटले आहे. या नव्या सरकारची राज्यपालांच्या वक्तव्यावर काय भूमिका आहे असा तिरकस सवाल त्यांनी विचारला. ‘ज्या महाराष्ट्राचं मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालाविषयी भूमिका घेतली पाहिजे.’ असा जाब त्यांनी राज्यातील नव्या सरकारला विचारला आहे.

हे द्वेषाचे राजकारण पेरत आहेत

राज्यपाल पदाचा कोश्यारी यांना मान नाही, त्यांना आदर नाही. ते सारखं जातीपातीत आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असल्याचा आरोप ही ठाकरे यांनी लावला. ते मराठी माणसाचा अपमान करत असतील आणि त्यांनी गुन्हा केला असेल तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा अशी हिंदू म्हणून मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दल हिणकस उद्गार काढले याची आठवण करुन देत राज्यपाल कोश्यारी यांचं पार्सल कुठून तरी पाठवल्याची खोचक टीका ही त्यांनी केली.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत