AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

loksabha Election | स्मृती इराणी यांनी हरवलं, वायनाडने तारलं; राहुल गांधी आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात?

केरळमधील सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 4 जागांसाठी उमेदवार जाहीर केली आहे. अशातच आता राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

loksabha Election | स्मृती इराणी यांनी हरवलं, वायनाडने तारलं; राहुल गांधी आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात?
RAHUL GANDHI VS SMRITI IRANIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 26, 2024 | 9:52 PM
Share

नवी दिल्ली | 26 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभर फिरत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघ अमेठी मधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा तब्बल 55 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. पण, केरळ येथील वायनाड मतदारसंघाने राहुल गांधी यांना तारले होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघही सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

राहुल गांधी यावेळची लोकसभा निवडणूक वायनाडमधून लढवणार नसल्याची चर्चा आहे. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी दोन मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्याचप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत असे या सूत्रांनी सांगितले.

केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) सोबत असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) लोकसभा निवडणुकीसाठी 4 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. CPI हा LDF चा दुसरा सर्वात मोठा घटक आहे. सीपीआयने वायनाड मतदारसंघातून ज्येष्ठ नेत्या ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय.

सीपीआयचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पन्नियान रवींद्रन यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्या या जागेचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर करत आहेत. यासोबतच सीपीआयने माजी कृषी मंत्री व्हीएस सुनील कुमार यांना त्रिशूर आणि युवा विंग ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेते सीए अरुणकुमार यांना मावेलिक्कारा येथून उमेदवारी दिली आहे.

सीपीआयने आपले चार उमेदवार जाहीर केल्यामुळे कॉंग्रेसची अडचण झाली आहे. मित्रपक्ष सीपीआय विरोधात लढायचे की राहुल गांधी यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधायचा अशा विवंचनेत कॉंग्रेस नेते सापडले आहेत. तर, 2019 च्या निवडणुकीत झालेली अमेठीसारखी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. कर्नाटक किंवा तेलंगणा राज्यातील एक आणि उत्तर प्रदेशातील एका जागेवरून अशा दोन ठिकाणाहून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.