‘अब की बार 400 पार’, भाजपच्या घोषणेमागचे पक्षाच्या नेत्याने गुपित केले उघड, म्हणाले… संविधान…

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. या निवडणुकीत भाजपने स्वत:साठी 370 तर एनडीएला 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य samor ठेवले आहे. 'अब की बार, 400 पार' या घोषणेवरून विरोधकांनी अनेकदा एनडीएवर निशाणा साधला आहे.

'अब की बार 400 पार', भाजपच्या घोषणेमागचे पक्षाच्या नेत्याने गुपित केले उघड, म्हणाले... संविधान...
pm narendra modi (1)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 8:57 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापुर्वीच भाजपने ‘अब की बार, 400 पार’चा नारा दिला. भाजपच्या या नाऱ्यामुळे विरोधकांना धडकी भरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांमुळेच जनता पुन्हा आपल्याला भरभरून मते देतील असा विश्वास व्यक्त केला. तर, विरोधकांनी भाजपला 400 जागा पार करून संविधान बदलायचे आहे आणि आरक्षण संपवायचे आहे, असा आरोप केला. देशात हुकूमशाही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एनडीएने 400 जागांचा आकडा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचेही विरोधकांनी म्हटले. यावरून दावे प्रतिदावे सुरु असतानाच भाजपच्या बड्या नेत्याने ‘अब की बार, 400 पार’ या घोषणेमागचे गणित उघड केले आहे. आपल्या पक्षाला 400 जागांची गरज का आहे हे या नेत्याने सांगितले आहे.

भाजपच्या या घोषणेवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली होती. राहुल गांधी यांनी काही आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका रॅलीला संबोधित केले. भाजपच्या 400 पार या घोषणेवर निशाणा साधताना ते म्हणाले, भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. त्यामुळे त्यांना 400 पेक्षा जास्त जागांची गरज आहे. भाजप नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सत्तेत आल्यास ते संविधान बाजूला ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे. भाजपचे नेते आरक्षण हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहेत. पण, कॉंग्रेस आरक्षणाची मर्यादा 50 टक्के वाढवणार आहे असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले होते.

विरोधकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ”संविधानाच्या रक्षणासाठी आपण आपल्या प्राणाचीही आहुती देऊ. काँग्रेसनेच संविधानावर हल्ला केला होता. पण ती वेळ आता निघून गेली आहे. म्हणूनच मी म्हणतो की, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत मी या संविधानासाठी लढत राहीन. त्यासाठी माझ्या प्राणाची आहुती देईन.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निशिकांत दुबे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भाजपने 400 जागांचे लक्ष्य पार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. भाजपचा संविधान बदलण्याचा कोणताही विचार नाही. एनडीए आणि भाजपला 400 जागांची गरज आहे ती याकरता की पाकव्याप्त काश्मीरला (पीओके) भारतात विलीन करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.