मुंबई : लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केलीय. त्यांची भूमिका आणि संवेदना स्पष्ट नाहीत. लखीमपूरच्या घटनेबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बंद पुकारणे म्हणजे रातांधळेपणा असल्याची टीका शेलार यांनी केलीय. (MLA Ashish Shelar criticizes MP Supriya Sule, MP Sanjay Raut)