AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. या सर्व राजकारणात आता काँग्रेसनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे (Congress Leaders Meet Sonia Gandhi). त्यासाठी प्रदेश काँग्रेसचं शिष्टमंडळ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेसचं शिष्टमंडळ सोनिया गांधींच्या भेटीला
| Updated on: Nov 01, 2019 | 11:00 AM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. या सर्व राजकारणात आता काँग्रेसनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे (Congress Leaders Meet Sonia Gandhi). त्यासाठी प्रदेश काँग्रेसचं शिष्टमंडळ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत, त्यानंतर काँग्रेसची नेमकी भूमिका स्पष्ट होईल (Congress Leaders Meet Sonia Gandhi).

या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांचीही (NCP Sharad Pawar) भेट घेतली होती. शरद पवारांनीच त्यांना सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. राज्यातील सद्य स्थिती पाहता कुठला निर्णय घ्यायला हवा त्याबाबत सोनिया गांधी मार्गदर्शन करु शकतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यानंतर काँग्रेसचं हे शिष्टमंडळ नवी दिल्लीसाठी रवाना झालं आणि आज ते सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करणार आहे.

युतीत पेच कायम

दुसरीकडे, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे (BJP-Shivsena Alliance). निवडणुकांनंतर युतीने बहुमताचं सरकार स्थापन करणे अपेक्षित होते, मात्र तसं न होता आता युतीतच फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या ठरलेल्या 50-50 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे युतीमध्ये तेढ निर्माण झाली आहे.

आता शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवसेनेने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठीही सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे, तर भाजप मात्र या विषयावर उडवाउडवीचे उत्तरं देत आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.