AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | मंदिरात रामाची मूर्ती असणार की, नाही? याची उद्धव ठाकरेंना चिंता, ते असं का म्हणाले?

Ram Mandir | येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. सगळ्या देशाला याची उत्सुक्ता आहे. पण त्याआधी राजकारणही जोरात सुरु आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

Ram Mandir | मंदिरात रामाची मूर्ती असणार की, नाही? याची उद्धव ठाकरेंना चिंता, ते असं का म्हणाले?
Uddhav thackeray-PM modi
| Updated on: Jan 13, 2024 | 1:24 PM
Share

Ram Mandir | उत्तर प्रदेशात अयोध्येत 22 जानेवारीला रामललाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. सगळेच लोक या ऐतिहासिक दिवसाची आतुरतेने वाट पाहतायत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला यावरुन राजकारणही सुरु आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजपा राम मंदिराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतेय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलय की, ते 22 जानेवारीला भगवान श्रीरामाची पूजा करतील. फरक इतकाच आहे की, पूजा अयोध्येऐवजी महाराष्ट्रात नाशिकमध्ये गोदावरीच नदीच्या तीरावर काळाराम मंदिरात होईल.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, ते आपल्या कार्यक्रमाच राष्ट्रपतींना आमंत्रण देतील. काळाराम मंदिरात मी भगवान रामाच दर्शन घेईन. गोदावरी नदीच्या तीरावर आरती करतील. सोमनाथ मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली, त्यावेळी राष्ट्रपती आले होते. त्यांच्याहस्ते प्राण प्रतिष्ठा झाली होती. 22 जानेवारीला राष्ट्रपतींना बोलवण्याची त्यांनी मागणी केलीय. उद्धव यांच्यामते, ही फक्त भगवान श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा नाहीय, देशाची प्रतिष्ठा आहे.

‘त्यांनी कधी फाफडावरही चर्चा करावी’

‘मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान मोदी फक्त चाय वर चर्चा का करतात? असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी कॉफी, बिस्किट फाफडावरही कधी चर्चा करावी. राम विराजमान होतायत, त्या बद्दल आम्ही दिवाळी साजरी करु. पण देशाच जे दिवाळ काढतायत, त्यावरही चर्चा झाली पाहिजे. ते म्हणाले की, “अटल सेतू बनवला. पण अटलजींचा फोटो नाही लावला. त्यामुळे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की, नाही याची मला चिंता आहे”

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला