नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीनेही विधानसभेच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानुसार सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.