AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द

महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द
| Updated on: Nov 16, 2019 | 4:29 PM
Share

मुंबई : महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. महासेनाआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमत होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली.

याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार, “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, उपरोक्त तीनही पक्षांचे  महत्वाचे नेते आणि आमदार  ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.  मानानीय राज्यपाल महोदय यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटीची  पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल”, असं म्हटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितली होती. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे स्पष्ट नव्हतं. मात्र तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचं विशेष लक्ष होतं.

राष्ट्रपती राजवट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

संबंधित बातम्या  

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली   

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला ‘पुन्हा आले’!  

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.