AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित दादांना मंगळवारी भेटण्यापूर्वी माणिकराव कोकाटेंच मोठं विधान, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी केलेलं एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अजित दादांना मंगळवारी भेटण्यापूर्वी माणिकराव कोकाटेंच मोठं विधान, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण
manikrao-kokate-and-ajit-pawar
| Updated on: Jul 26, 2025 | 9:27 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे विजय घाडगे यांना तसा शब्द आज अजित पवार यांनी दिला आहे. त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी केलेलं एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अजित पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं – कोकाटे

माणिकराव कोकाटे यांनी एका सभेत बोलताना म्हटले की, ‘अजित पवार आम्हाला न्याय देऊ शकतात असं जनतेला वाटत आहे. आता राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी तुमची माझी इच्छा आहे.’ याचाच अर्थ कोकाटे यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कोकाटेंच्या व्हिडिओमुळे राजकारण पेटलं

माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेनं राजीनाम्यासाठी त्यांना निवेदन दिलं. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे जिथे बसले होते, तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते उधळण्यात आले. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे राजकारण आणखी पेटलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसही नाराज

काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली होती, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता फडणवीस या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.