AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूर अस्थिर; अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अजित पवार यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Manipur Violence News : अजित पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; वाचा सविस्तर...

मणिपूर अस्थिर; अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अजित पवार यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 07, 2023 | 5:05 PM
Share

पुणे : मणिपूर राज्यात सध्या हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झालाय. अशात महाराष्ट्रातून मणिपूरला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विधनसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आपले विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या विद्यार्थ्यांना कसं आणायचं? यासाठी मी पत्र लिहिलंय. त्याबद्दल त्यांनी केंद्राही बोलून सुरक्षितपणे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणावं. अशी विनंती केली आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मणिपूरमधील परिस्थितीबद्दल मेरी कोमनंही विधान केलंय. तिथली परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणावी.दिसताच क्षणी गोळ्या घाला असे आदेश आले होते, असं कानावर आलं होतं. पण तिथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणं गरजेचं आहे.

मणिपूर धगधगतंय

मणिपूर मागच्या काही दिवसांपासून धगधगतं आहे. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी हा हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलंय. अजित पवार भाजपसोबत जाणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. त्यावरही अजित पवार बोललेत. तुम्ही प्रश्न विचारता म्हणून संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातं. ज्यांना माझं काम बघवत नाही. ज्यांना मी जे करतो त्याबद्दल काहीतरी मनात असतं. आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते माझ्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार करतात, असं अजित पवार म्हणालेत.

राज ठाकरे यांची काल रत्नागिरीत सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली. त्याला अजित पवार यांनी खोचक उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा