AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘निसर्ग कोपला असला तरीही, कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंची ग्वाही

शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल; अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वाण टाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली आहे.

'निसर्ग कोपला असला तरीही, कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही', धनंजय मुंडेंची ग्वाही
धनंजय मुंडेंचा पाहणी दौरा
| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 03, 2021 | 9:30 PM
Share

परळी : गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही. शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल; अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वाण टाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली आहे. (Dhananjay Munde promises to help flood affected farmers)

29-30 सप्टेंबरच्या रात्रीतून झालेल्या अतिवृष्टीने अनेकांना जीव मुठीत धरून बसावे लागले. मागील 25 वर्षांच्या काळात इतका पाऊस कधी झाला नव्हता. वाण नदीने विक्राळ स्वरूप धारण करत एका पात्राचे तीन पात्र केले. पाणी, दगड गोटे शेतांमध्ये शिरले. नुकसान पाहताना शेत कोणते आणि नदी पात्र कोणते असा सवाल मनात येतो आहे. त्यामुळे झालेले नुकसान हे पंचनामे करण्या पलीकडचे आहे, असंही मुंडे म्हणाले. या परिस्थितीची मुंडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परळी तालुक्यातील वाण टाकळी, नागापूर, लाडझरी तसेच नागदरा आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

शेतीसह वाहून/खरडून गेलेल्या जमिनींचीही मिळेल भरपाई

बीड जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, विशेषकरून नदी काठच्या गावांमध्ये शेतातील पिकांचे 100 टक्के नुकसान तर झालेच आहे. मात्र, जमिनीतील माती अक्षरश: वाहून गेली आहे. त्यामुळे तिथे पंचनामे करण्यासारखे आता काही उरलेच नाही. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेलच शिवाय पुढच्या हंगामात त्यांना जमिनी कसता याव्यात यासाठीही आम्ही मदत करणार असल्याचे मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं.

दगड गोट्यांतून काढली वाट…

वाण नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने शेती सह, पूल रस्ते, घरे असे अतोनात नुकसान झाले आहे. मुंडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कुठे तुटलेल्या पुलाच्या काठावरून, कुठे नदी पात्रात दगड गोट्यांमधून वाट काढत, तर कुठे वाहून गेलेल्या रस्त्यातून वाट शोधत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करत अनेकांचे वाचवले प्राण

29 सप्टेंबर च्या रात्री उशिरा जेव्हा अतिवृष्टीने पूर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे फोन येत होते, तेव्हा सर्व मदत व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना मी स्वतः फोनवरून बोलून सूचना देत होतो. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्र जागून काढली. पुरात शेतात, झाडावर आसरा घेतलेल्या नागरिकांना तत्परतेने सुरक्षित बाहेर काढले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, याचे समाधान आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत बचाव व मदत कार्य केलेल्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे विशेष कौतुक करतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

इतर बातम्या :

बच्चन मला म्हणाले, तुम्ही तरुण दिसता, मग गडकरींनी काय उत्तर दिलं? वाचा

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

Dhananjay Munde promises to help flood affected farmers

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!.

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं.

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली