AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : तेव्हा मुख्यमंत्री भेटले नाहीत अन् उपमुख्यंत्र्यांनी झोपा काढल्या..! मविआचा कारभार बावनकुळेंनी एका वाक्यात मांडला

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याअनुंशाने आता नुकसानीचा आढावा सरकारकडे दिला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विरोधकांकडून बाऊ केला जात असला तरी महाविकास आघाडी सरकारने एवढी नुकसान भरपाई दिली नाही त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई हे सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. मदतीबरोबरच ती योग्य व्यक्तीला मिळणेही तेवढेच गरजेचे आहे.

Chandrashekhar Bawankule : तेव्हा मुख्यमंत्री भेटले नाहीत अन् उपमुख्यंत्र्यांनी झोपा काढल्या..! मविआचा कारभार बावनकुळेंनी एका वाक्यात मांडला
आ. चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 06, 2022 | 4:11 PM
Share

ठाणे : आता (Maharashtra Politics) राज्यात शिंदे आणि फडवणवीस यांचे सरकार असले तरी भाजपाचे नेते (MVA) महाविकास आघाडीवर टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आतापर्यंत उध्दव ठाकरे हे कुणाला भेटत नव्हते असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार हे दिवस उजाडताच कामाला सुरवात करातात याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील अनेक नेत्यांनी दिली आहे. असे असताना (Chandrashekhar Bawankule) आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सडकून टिका केली आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे कुणाला भेटले नाहीत तर अजित पवार यांनी केवळ झोपा काढल्या असा आरोप त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस प्रत्येक काम करेल आणि जनतेला न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर जे अडीच वर्षात झाले नाही ते आताच्या सरकारच्या काळात विकास कामे होतील असेही त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याअनुंशाने आता नुकसानीचा आढावा सरकारकडे दिला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विरोधकांकडून बाऊ केला जात असला तरी महाविकास आघाडी सरकारने एवढी नुकसान भरपाई दिली नाही त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई हे सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. मदतीबरोबरच ती योग्य व्यक्तीला मिळणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे वेळ लागला तरी योग्य व्यक्ती आणि योग्य ती रक्कम मिळणे गरजेचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

शिंदे सरकारचे 36 दिवसांमध्ये 42 निर्णय

शिंदे सरकारची स्थापना होऊन केवळ 36 दिवस झाले आहेत. या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 42 निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन पक्षामुळे विकासात्मक निर्णयात सातत्याने खोडा घातला जात होता. आता हे सरकार निर्णय घेण्यास मोकळे असून प्रत्येक काम करेल आणि जनतेला न्याय देईल असे आहे. शिवाय मागच्या सरकारच्या तुलनेत 4 पटीने अधिक कामेही होतील. सरकारच्या कामाची पध्दत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अनुभवत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

अजित पवारांचे लक्ष बारामतीवरच

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना त्वरीत मदत मिळावी अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत आहेत पण सत्तेत होते त्यावेळी केवळ बारामतीच्या विकासावर त्यांचे लक्ष होते. विकास कामातील दुजाभाव आता सर्वसामान्यांपासून लपून राहणारा नसल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मंत्रमंडळाच्या विस्ताराच्या अनुशंगाने दिल्लीला गेले नाहीत तर नीती आयोगाच्या भेटीसाठी गेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत