T20 World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, आयसीसीचा बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
ICC Womens T20 World Cup 2026 Prize Money: क्रिकेट चाहत्यांना कायमच आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या प्राईज मनीबाबत जाणून घेण्याची उत्सूकता असते. जाणून घ्या साखळी सामन्यातील विजयानंतर संघाला किती रक्कम मिळणार.

आयसीसीने 12 जूनपासून सुरु होणाऱ्या वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी (Icc T20 World Cup 2026) मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटबाबत वाढती लोकप्रियता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने इंग्लंडमध्ये आयोजित टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजेत्या संघाची चांदी होणार आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर वर्ल्ड कप विजेत्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.
वर्ल्ड चॅम्पियन टीमला किती प्राईज मनी मिळणार?
आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत चांगलीच वाढ केली आहे. त्यानुसार वर्ल्ड कप विजेत्या संघाला 2.34 मिलियन डॉलर अर्थात 22 कोटींपेक्षा जास्त रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. तर उपविजेता संघालाही चांगली रक्कम मिळणार आहे. आयसीसीकडून रनरअप टीमला 1.17 मिलियन डॉलर अर्थात 11 कोटी रुपये मिळणार आहे.
सेमी फायनलमधील पराभूत संघाला किती कोटी?
वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागी संघांनाही आयसीसीकडून एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे. आयसीसीकडून स्पर्धेतील सहभागी संघाला प्रत्येकी 247,500 डॉलर अर्थात जवळपास 2 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच उपांत्य फेरीतील एकूण 2 पराभूत संघाला आयसीसीकडून जवळपास 6 कोटी 56 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.
साखळी फेरीतील विजयासाठी किती लाख रुपये?
आयसीसीने बाद फेरीसह साखळी फेरीतील सामन्यांसाठीही एक रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार साखळी फेरीत सामने जिंकणाऱ्या संघांला बोनस म्हणून रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे विजेत्या संघ मालामाल होईल. मिळालेल्या माहितीनुसार, साखळी फेरीतील विजयी संघाला जवळपास 29 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
टीम इंडिया प्रबळ दावेदार
दरम्यान टीम इंडिया या टी 20i वर्ल्ड कप 2026 विजयासाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. टीम इंडियाने नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करुन पहिलावहिला आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. त्यामुळे टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
