AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात स्फोटक मुलाखत

MLA Nitin Deshmukh And MLA Kailas Patil on CM Eknath Shinde Rebellion : उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले अन् 6 महिन्यातच सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या; त्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडातील धागेदोरे सांगितले...

बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात स्फोटक मुलाखत
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 17, 2023 | 8:41 AM
Share

मुंबई : 2019 ला मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटली अन् शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. पुढे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अन् उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पण गेल्या वर्षी तेव्हा नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत युती केली. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान नक्की काय घडलं? आमदार सूरतला कसे गेले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कधी ठरलं? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले. त्याची उत्तरं देणारी एक मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे.

अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत.

सत्तांतर होण्याच्या एक महिनाआधी आम्हाला हे माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित हे माहिती नसावं. पण स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की, मी मुख्यमंत्री होणार आहे, असं गौप्यस्फोट नितीन देशमुख केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय सांगतात माध्यमांसमोर की मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. पण फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नव्हतं. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती होतं की मुख्यमंत्री होणार ते, असा खुलासा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सहा महिन्यातच सत्ता बदल करण्याच्या आणि बंडखोरीच्या तयारीला सुरूवात झाली, असं नितीन देशमुख म्हणालेत.

आमदार कैलास पाटील यांनीही मोठे खुलासे केलेत. त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्यावर भेटत नाहीत. ते लोकांना वेळ देत नाहीत, असे आरोप करणं चूक आहे. कारण आम्ही पहिल्यांदा आमदार झालेलो असताना ते आम्हाला वेळ द्यायचे. आमच्याशी चर्चा करायचे मग मंत्र्यांनी तर आम्हाला वेळ दिली जात नाही, असं म्हणणं चूक आहे. कारण मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्याला व्हायची यात हे मंत्री उपस्थित असायचे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार