Maharashtra politics : राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिवसेनेचे अनेक जण आमच्या संपर्कात, भूमरेंचा दावा

शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे हे अखेर 15 दिवसांनी आपल्या घरी परत आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra politics : राऊत आता उरलेली शिवसेना पण संपवणार; शिवसेनेचे अनेक जण आमच्या संपर्कात, भूमरेंचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:15 PM

औरंगाबाद : शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) हे पंधरा दिवसांनी आपल्या घरी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही गद्दारी केली नाही आम्ही राज्यसभेत आणि विधानपरिषदेत पक्षांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान केलं. संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार नाही झालो तर आमच्यामुळे संजय राऊत खासदार झाले आहेत. संजय राऊत हे उरलेली सेना देखील संपवणार आहेत. राऊत यांच्यामुळेच हे बंड झालं. या सगळ्या प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे. तसेच शिवसेनेत जे लोक सध्या शिल्लक आहेत त्यातील अनेक जण आमच्या संर्पकात असल्याचा दावा देखील भूमरे यांनी केला आहे.

आमचा शिंदे साहेबांना पाठिंबा

पुढे बोलताना भूमरे म्हणाले की, आज पंधरा दिवसानंतर आम्ही घरी आलो आहोत. घरापासून दूर होतो, एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला आणि आम्ही विचार न करता त्यांच्यासोबत गेलो. आम्ही पैसा किंवा पदाच्या लालसेने गेलो नव्हतो, पैशांना मी आयुष्यात कधीही महत्त्व दिलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांसाठी गेलो. उध्दव ठाकरे यांच्या जवळचे लोक आम्हाला भेटू देत नव्हते आमचे कामं होत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला अडचणीत आणत होती, त्यामुळे हे बंड करावं लागलं. आता उद्धव ठाकरे हे रोज बैठका घेतात. सेनाभवनला जातात. त्यांनी हेच जर आधी केलं असतं आम्हाला भेट दिली असती, आमचे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती असं भूमरे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भूमरेंनी सुरक्षा नाकारली

जे आमदार शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले आहेत, त्या आमदारांना केंद्राकडून वाय दर्जाची सेवा पुरवण्यात येत आहे. मात्र संदिपान भूमरे यांनी  ही सुरक्षा नाकारली आहे. सुरक्षेची गरज नसल्याचे संदिपान भूमरे यांनी म्हटले आहे. भूमरेंपूर्वी गुलाबराव पाटलांनी देखील असाच आरोप केला होता. आमच्या नेत्यांना भेटू दिले जात नसल्याचे पाटील यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.