AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार; मनसे आमदार राजू पाटलांची टीका

25 वर्षांपासून भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली.

कल्याण शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार; मनसे आमदार राजू पाटलांची  टीका
| Updated on: Oct 13, 2020 | 5:55 PM
Share

कल्याण : केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी (MNS MLA Raju Patil) टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे करण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे (MNS MLA Raju Patil).

कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील आठ पटीने मालमत्ता कराची आकारणी केली जात आहे. त्यापैकी 18 गावे वगळण्यात आली आहेत. तर 9 गावे महापालिकेत आहे. त्या 9 गावातील नागरीकांना लावण्यात आलेल्या जास्तीच्या मालमत्ता करात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याणचा पत्रीपूल जगातील आठवे आश्चर्य ठरणार वाटतं; मनसेचा शिवसेनेला टोला

या दरम्यान, त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. या पुलावरून महापालिकेत येताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले (MNS MLA Raju Patil).

विविध विकास कामे होत नाहीत, यासाठी काल भाजप नगरसेवक आणि भाजप आमदार चव्हाण यांनी महापालिकेत आंदोलन केलं होतं. केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलवर केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यापूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

नवी मुंबईत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाष्य करताना आमदार पाटील यांनी सांगितलं. “मी फक्त चार माणसं घेऊन गेलो होते. त्याठिकाणी निमंत्रणा व्यतिरिक्त लोक आले. हे सगळं होत राहतं. त्याला राजकीय दृष्टीने बघणे ठीक नाही. मी जी काही सूचना करायची होती ती केली आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

MNS MLA Raju Patil

संबंधित बातम्या :

मनसे आमदार राजू पाटील अजित पवारांच्या भेटीला

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.