AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार; मनसे आमदार राजू पाटलांची टीका

25 वर्षांपासून भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका राजू पाटील यांनी केली.

कल्याण शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार; मनसे आमदार राजू पाटलांची  टीका
| Updated on: Oct 13, 2020 | 5:55 PM
Share

कल्याण : केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलनावर मनसे आमदार राजू पाटील यांनी (MNS MLA Raju Patil) टीका केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वी राजकीय घटस्फोट झाला. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे करण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे (MNS MLA Raju Patil).

कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील आठ पटीने मालमत्ता कराची आकारणी केली जात आहे. त्यापैकी 18 गावे वगळण्यात आली आहेत. तर 9 गावे महापालिकेत आहे. त्या 9 गावातील नागरीकांना लावण्यात आलेल्या जास्तीच्या मालमत्ता करात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी राजू पाटील यांनी आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याणचा पत्रीपूल जगातील आठवे आश्चर्य ठरणार वाटतं; मनसेचा शिवसेनेला टोला

या दरम्यान, त्यांनी कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात बोलताना “पत्री पुलाचे ज्या प्रकारे काम सुरु आहे, तो जगातील आठवा अजूबा होणार असे वाटतंय”, अशी टीका त्यांनी केली. या पुलावरून महापालिकेत येताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरीकांना किती त्रास सहन करावा लागतो. याकडेही आमदारांनी लक्ष वेधले (MNS MLA Raju Patil).

विविध विकास कामे होत नाहीत, यासाठी काल भाजप नगरसेवक आणि भाजप आमदार चव्हाण यांनी महापालिकेत आंदोलन केलं होतं. केडीएमसीत भाजपच्या कालच्या ठिय्या आंदोलवर केली आहे. शिवसेना-भाजपमध्ये सहा महिन्यापूर्वी राजकीय घटस्फोट झाला आहे. भाजप दायित्वापासून दूर जाऊ शकत नाही. 25 वर्षांपासून भाजप त्यांच्यासोबत सत्तेत होती. त्यामुळे शहराचे वाटोळे लावण्यात भाजपचाही तितकाच सहभाग आहे अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

नवी मुंबईत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाष्य करताना आमदार पाटील यांनी सांगितलं. “मी फक्त चार माणसं घेऊन गेलो होते. त्याठिकाणी निमंत्रणा व्यतिरिक्त लोक आले. हे सगळं होत राहतं. त्याला राजकीय दृष्टीने बघणे ठीक नाही. मी जी काही सूचना करायची होती ती केली आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

MNS MLA Raju Patil

संबंधित बातम्या :

मनसे आमदार राजू पाटील अजित पवारांच्या भेटीला

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.